अखेर स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केल्या ‘Last Few’ च्या पोस्ट, नेटकरी म्हणतात-

MARATHI SERIAL GOING OFF AIR: गेल्या काही दिवसांपासून स्टार प्रवाहावरील मालिका संपणार असल्याचं बोललं जातंय. आता कलाकारांनीही या गोष्टीला दुजोरा दिला आहे.
lakshmichya pavlani

lakshmichya pavlani

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका या प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण करतात. त्यातील कलाकार त्यांना आपले वाटतात. मात्र या मालिका जेव्हा अचानक बंद केल्या जातात तेव्हा प्रेक्षकांना देखील धक्का बसतो. गेल्या काही दिवसात स्टार प्रवाहने दोन नवीन मालिकांची घोषणा केली. या मालिकांपैकी एक आहे मधुराणी गोखलेची ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’. ही मालिका ५ जानेवारीपासून सुरू होणार आहे. तर, अनुष्का सरकटे व इंद्रनील कामत यांच्या मुख्य भूमिका असलेली ‘वचन दिले तू मला’ ही मालिका येत्या १५ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र आता या मालिकांसाठी चांगल्या सुरू असलेल्या मालिकेला बंद करण्यात येणार आहे. या मालिकेतील कलाकारांच्या पोस्ट सध्या चर्चेत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com