सायलीचं आहे खरी तन्वी, सुभेदारांसमोर येणार सगळ्यात मोठं सत्य, 'ठरलं तर मग'चा शेवट सुरू?

THARLA TAR MAG BIG EXPOSED: छोट्या पडद्यावरील सर्वाधिक गाजलेल्या मालिकांपैकी एक असणारी लोकप्रिय मालिका ;ठरलं तर मग' मध्ये खऱ्या तन्वीची ओळख सगळ्यांसमोर येणार आहे. पण पुढे मालिकेत काय घडणार?
tharla tar mag upcoming episode

tharla tar mag upcoming episode

esakal

Updated on

छोट्या पडद्यावर गेली ३ वर्ष टीआरपी आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी लोकप्रिय मालिका म्हणजे 'ठरलं तर मग'. एका अपघाताने तन्वी किल्लेदारांपासून दुरावते. मधुभाऊंच्या आश्रमात राहायला जाते. पण नशीब पुन्हा तिला त्याच घरात घेऊन येतं. अर्जुनशी तिचं लग्न होतं आणि ती सुभेदारांची सून म्हणून घरात येते. मात्र तेव्हा कुणालाच ती खरी तन्वी आहे हे सत्य ठाऊक नाहीये. आता तीन वर्षानंतर सायलीने ती स्वतः तन्वी असल्याचं शोधून काढलंय. मधुभाऊंना तिने याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनीही तिचं खरी तन्वी असल्याचं सांगितलं. आता मालिकेतलं सगळ्यात मोठं सत्य सुभेदार आणि किल्लेदारांसमोर येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com