

yuhi koi mil gaya tha
esakal
१९७२ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत एक असा चित्रपट प्रदर्शित झाला, ज्याला पूर्ण होण्यासाठी तब्बल १५ वर्षे लागली. आम्ही सांगत आहोत कमाल अमरोही यांनी दिग्दर्शित आणि निर्मित केलेल्या 'पाकिजा' या अजरामर चित्रपटातीबद्दल. अभिनेत्री मीना कुमारी आणि कमाल अमरोही यांनी १९५२ मध्ये लग्न केलं. त्यानंतर त्यांनी 'दायरा' नावाचा चित्रपट बनवला, जो १९५३ मध्ये प्रदर्शित झाला; पण तो फारसा यशस्वी ठरला नाही. त्यानंतर १९५६ मध्ये कमाल अमरोही यांनी मीना कुमारी यांना घेऊन 'पाकिजा' बनवण्याचा निर्णय घेतला.