
abhijit amkar
esakal
छोट्या पडद्यावरील मालिका 'तू ही रे माझा मितवा' ने फार कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलंय. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीये. टीआरपी यादीत देखील या मालिकेने टॉप ५ मध्ये स्थान मिळवलंय. या मालिकेतील अर्णव आणि ईश्वरी प्रेक्षकांचे आवडते आहेत. यात अभिनेता अभिजीत आमकार आणि अभिनेत्री शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत आहेत. नुकतंच मालिकेत या दोघांचं लग्न झालेलं पाहायला मिळालं. मात्र त्यानिमित्ताने अभिजीत खऱ्या आयुष्यात लग्न कधी करणार असा प्रश्न त्याला विचारला जातोय. त्यावर त्याने आता उत्तर दिलंय.