मुंबई: आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्याने नोकऱ्या जाणार की काय अशी भीती एकीकडे वाटत असताना तसेच आय टी क्षेत्रातही सध्या बेरोजगारीचा आलेख उंचावत असताना येत्या एक ते दीड वर्षात नवे तंत्रज्ञान आणि कौशल्ये असणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनियर्सची संख्या वाढणार असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. त्यामुळे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स तसेच काळासोबत बदलणारी नवी कौशल्ये आत्मसाद करणाऱ्या इंजिनियर्सना चांगल्या संधी उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाली आहे. या अभ्यासानुसार पुढील दीड वर्षात काळासोबत येणारी नवी कौशल्य आत्मसाद करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनियर्सची मागणी ९ ते १० लाखांपर्यंत असू शकते.