Premium|Study Room : प्रेम आणि ज्ञान यांचा सुवर्णमध्य साधणारे जीवन

Love and knowledge : प्रेम आणि ज्ञान यांच्या समन्वयातूनच सार्थ जीवन घडते, हे बर्ट्रांड रसेल यांच्या विचारांतून स्पष्ट होते. डॉ. रवींद्र कुमार यांच्या जीवनकथेच्या माध्यमातून या लेखात करुणा, विवेक, शिक्षण आणि मानवी कल्याण यांचे सखोल तत्त्वज्ञान मांडले आहे.
Love and knowledge

Love and knowledge

esakal

Updated on

निखिल वांढे

बिहारमधील एका छोट्याशा गावात, डॉ. रवींद्र कुमार यांची सकाळ एका तात्पुरत्या स्वरूपाच्या दवाखान्यात रुग्णांच्या सेवेने उजाडायची. जे रुग्ण उपचारांचा खर्च पेलू शकत नसत, त्यांच्याकडून ते एक पैसाही घेत नसत. दुपारच्या वेळी ते एका विशाल वडाच्या झाडाखाली गावातील मुलांना शिकवण्याचे कार्य करत. दिल्लीत उच्च वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यावरही या दरिद्री गावात परतण्याचे कारण विचारले असता, ते मंद स्मितहास्य करत म्हणत, "माझ्या हृदयाने मला माझ्या लोकांच्या सेवेसाठी परत आणले, पण माझ्या शिक्षणाने मला ती सेवा कशी करावी, याचा मार्ग दाखवला."

डॉ. कुमारांचे जीवन तत्त्वज्ञ बर्ट्रांड रसेल यांनी मांडलेल्या एका सखोल सत्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. "एक सार्थ जीवन तेच, जे प्रेमाने प्रेरित असते आणि ज्ञानाने मार्गदर्शित असते." हे विधान मानवी अस्तित्वाचे दोन भक्कम स्तंभ स्पष्ट करते प्रेम जीवनाला हेतू आणि दिशा देते, तर ज्ञान त्या ध्येयाप्रत पोहोचण्यासाठी आवश्यक साधने आणि कार्यक्षमता प्रदान करते. यातील एकही घटक एकाकी पूर्ण नाही, ज्ञानाशिवाय असलेले प्रेम निष्फळ ठरू शकते, तर प्रेमाशिवाय असलेले ज्ञान कोरडे आणि विघातक ठरू शकते. मग प्रेम आणि ज्ञान मिळून एक सार्थ जीवन कसे बरे घडते? चला तर जाणून घेवूया…

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com