

Dairy Scheme Failure
esakal
दुग्धव्यवसायातून आदिवासींच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन होईल अशी आशा होती; पण गौतम चॅटर्जींची बदली झाली आणि दुग्धव्यवसायाचे तीन तेरा वाजले. शासकीय विभागांमध्ये शिथिलता आली. संघटनेला परत प्रशासनाशी संघर्ष करण्यामध्ये वेळ घालवावा लागला. पर्यायाने दुग्धव्यवसाय, जो मुक्त वेठबिगारांच्या आयुष्यात उद्याच्या जगण्याची नवी आशा घेऊन आला होता तो अखेरीस बंद झाला. तरीही वेठबिगार मुक्त झाल्यानंतर तो पुन्हा वेठबिगारीत गेला नाही. कारण संघटनेने त्याला जगण्याचा आत्मविश्वास दिला होता...