Premium| Albert Ekka: १९७१ च्या युद्धात प्राणांची पर्वा न करता अल्बर्ट एक्काने शत्रूचा पराभव केला. त्यांचा पराक्रम आजही सैनिकांना प्रेरणा देतो

Param Vir Chakra: १९७१ च्या भारत पाक युद्धात गंगासागरच्या लढाईत लान्सनायक अल्बर्ट एक्काने अद्वितीय शौर्य दाखवत प्राणांची आहुती दिली. त्यांच्या धैर्यामुळे भारतीय सैन्याने सामरिक विजय मिळवला
Param Vir Chakra
Param Vir Chakraesakal
Updated on

मेजर मोहिनी गर्गे – कुलकर्णी (निवृत्त)

mohinigarge2007@gmail.com

लष्करी इतिहासातल्या काही लढाया भूभागावरून ओळखल्या जातात, तर काही मात्र आपल्या प्राणासह सर्वस्व समर्पित करणाऱ्या वीरांच्या नावाने अमर होतात! ‘राष्ट्र प्रथम’ या मंत्राचं मूर्तिमंत उदाहरण असणाऱ्या या लढाया म्हणजे येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी स्फूर्तीचा अखंड स्रोतच! १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातली गंगासागरची लढाई अशाच एका वीर योद्ध्याच्या नावाने प्रसिद्ध आहे. हा परमवीर म्हणजे लान्सनायक अल्बर्ट एक्का!

पेटलेला ईशान्य

१९७१ चं वर्ष! ईशान्येकडे फोफावणाऱ्या दहशतवादाचा बंदोबस्त करण्यासाठी भारतीय सैन्याच्या अनेक मोहिमा आकार घेऊ लागल्या. प्रत्यक्ष युद्धाला तोंड फुटलं. या युद्धादरम्यान १४ गार्ड्स बटालियनला एक अत्यंत महत्त्वाचं कार्य सोपवण्यात आलं. ते म्हणजे - गंगासागर येथील शत्रूच्या मजबूत तटबंदी असलेल्या चौकीवर ताबा मिळवणं. ही चौकी तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानातील (आता बांग्लादेश) ब्राह्मणबारिया जिल्ह्यात अगरताळपासून ६ किलोमीटर दूर पश्चिमेला होती. ढाक्याला जोडणाऱ्या एका प्रमुख रेल्वेमार्गावर असलेल्या या शत्रूच्या ठिकाणाला सामरिक दृष्टीने खूप महत्त्व होतं. ९ वर्षांचा अनुभव गाठीशी असलेला अल्बर्ट तिथे सज्ज झाला!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com