

Aravalli Conservation Yatra 2026 India
esakal
देशातील सर्वांत प्राचीन पर्वतरांगा असलेल्या अरावलीच्या संरक्षणासाठी एकत्र आलेल्या अरावली विरासत जन अभियानतर्फे अरावली संरक्षण यात्रा सुरू झाली आहे.
गुजरातपासून सुरू झालेल्या या यात्रेचा ४० दिवसांनी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत समारोप होईल. ७०० किलोमीटर लांबीच्या यात्रेमध्ये गुजरात, राजस्थान, हरियाना या चार राज्यांमध्ये अरावली पर्वतरांगांच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना अरावलीचे महत्त्व समजावून सांगितले जाणार आहे. अरावलीचा नेमका मुद्दा, न्यायालयातील लढा आणि आता यात्रेच्या निमित्ताने रस्त्यावर उतरून सुरू झालेले आंदोलन या पार्श्वभूमीवर अरावली पर्वतरांगांना ''अत्यंत महत्त्वाचे पर्यावरणीय क्षेत्र'' म्हणून घोषित केले जावे,
अशी मागणी करणारे जलसंवर्धनात जागतिक कीर्तीचे काम केलेले आणि जलपुरुष म्हणून ओळखले जाणारे तरुण भारत संघाचे संस्थापक राजेंद्रसिंह यांची सरकारनामाचे प्रतिनिधी अजय बुवा यांनी घेतलेली मुलाखत..