Premium|Sholay 50 years: ५० वर्षांनंतरही 'शोले'ची जादू कायम, दिग्दर्शक रमेश सिप्पींनी दिला आठवणींना उजाळा

Gabbar Singh Amjad Khan: भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय चित्रपट ‘शोले’ला पन्नास वर्षं पूर्ण झाली आहेत. दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी गब्बरच्या व्यक्तिरेखेबाबत, अमजद खान यांच्या निवडीबाबत आणि या कलाकृतीमागील आठवणी शेअर केल्या
Sholay 50 years

Sholay 50 years

esakal

Updated on

५० वर्षांनंतरही प्रेक्षक ‘शोले’ची चर्चा करतील असं तुम्हाला कधी वाटलं होतं?

मला सांगावंसं वाटतं, की खरं तर मला त्याबाबत कल्पना होती. मात्र, असं थेट म्हणणं चुकीचं ठरेल. ‘शोले’ बनवताना असा काही विचार डोक्यात आला नाही. मात्र, मी चांगला सिनेमा तयार करेन एवढंच डोक्यात फिट्ट होतं. मात्र, ‘शोले’ एवढा लोकप्रिय होईल, एवढा चालेल की प्रेक्षक ५० वर्षांनंतरही त्याबद्दल चर्चा करत राहतील आणि रसिक तो अजूनही पाहतील, असा विचार कधीच केला नव्हता.

माझं आणि ‘शोले’चं नातं अगदी हृदयाजवळचं आहे. मी त्याच्यापासून स्वतःला वेगळं करू शकत नाही. हा सिनेमा मी खूप प्रेमाने, जीव ओतून बनवला. ज्या पद्धतीने प्रेक्षकांनी ‘शोले’ला प्रेम दिलं त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आज ५० वर्षांनंतर आपण या चित्रपटाबद्दल बोलतोय, हे खूप छान वाटतं. मात्र, त्यावेळी याची पुसटशीही कल्पना नव्हती.

मेगास्टारच्या गर्दीत त्या वेळी नाटकात काम करणाऱ्या नवख्या अमजद खान यांना घेण्याचा विचार मनात कसा आला?

आम्ही गब्बरच्या भूमिकेसाठी डॅनी डेंजोप्पा यांना साईन केलं होतं; पण ते फिरोज खान यांच्या ‘धर्मात्मा’साठी अफगाणिस्तानमध्ये चित्रीकरण करत होते. त्यामुळे तारखा जुळत नव्हत्या. मग दोन पर्याय होते, त्यांची वाट पाहणं किंवा नवीन चेहरा घेणं... बाकी सर्व कलाकारांच्या तारखा आम्ही घेतल्या होत्या, त्यामुळे थांबणं शक्य नव्हतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com