Premium| Shivaji's Strategic Mastery: छत्रपती शिवाजी महाराजांनी एकाच वेळी मुघल, सिद्दी आणि इंग्रजांना कसे आव्हान दिले?

Maratha Campaigns Challenge Mughals: मे १६७१ मध्ये मुघलांनी काही लहान किल्ले परत घेतले होते. परंतु मोरोपंतांनी जव्हार आणि रामनगर जिंकून मराठ्यांचा उत्तर कोकणातील विस्तार सुरक्षित केला.
Battle of Salher

Battle of Salher

esakal

Updated on

केदार फाळके

editor@esakal.com

साल्हेर जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांना गुजरात आणि खानदेश प्रांतांवर धडक देण्यासाठी लष्करी तळ मिळाला. साल्हेराचे स्थान सुरतेच्या आग्नेयेस १२५ कि.मी., नंदुरबारच्या दक्षिण-दक्षिणपश्चिमेस ५० कि.मी., बुरहानपुराच्या पश्चिम-दक्षिणपश्चिमेस २५० कि.मी. आणि औरंगाबादेच्या उत्तर-पश्चिमेस १७५ कि.मी. अंतरावर आहे. त्यामुळे मराठ्यांचे वेगवान घोडदळ सर्व ठिकाणी सहज पोहोचू शकले. साल्हेरामुळे मराठ्यांची उत्तर दुर्गांची शृंखला सह्याद्रीच्या कडेस असलेल्या दोन महत्त्वाच्या मुघल मार्गांवरील सुरत–नाशिक–जुन्नर आणि सुरत–श्रीगोंदा दळणवळण नियंत्रित करीत होती.

या विस्ताराने मराठ्यांना एकाच वेळी अनेक धोरणे साध्य करण्यास सक्षम बनविले, तर मुघलांना सर्व दिशांचे रक्षण आणि बचाव करणे कठीण झाले. सह्याद्रीच्या साहाय्याने, शिवाजी महाराज कोणत्या दिशेने हल्ला करणार हे शेवटच्या क्षणापर्यंत गुप्त ठेवणे शक्य झाले. साल्हेराचा विजय मुघल सैन्यावर प्रचंड ताण आणणारा ठरला. मराठ्यांच्या वेगवान हालचाली, विस्तृत मोर्चा आणि गुप्त मार्गांचा लाभ घेऊन त्यांनी मुघली नियंत्रणाच्या सर्व उपायांना आव्हान दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com