

जेव्हा 'मी टू' चळवळ जोरात होती त्यावेळी समाजमाध्यमांवर अनेक लोकांना त्यांना आलेले लैंगिक अत्याचार अथवा शोषणाचे अनुभव लिहीले होते.
एका मुलाने लिहीलं होतं, मे महिन्यात जेव्हा माझ्या गुदद्वारातून एकदा रक्त आलं तेव्हा आईला वाटलं की मी खूप आंबे खाल्लेत आणि मला उष्णता झालीय. पण कारण वेगळंच होतं. त्या उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर मी कधीच गावी जायला उत्सुक नव्हतो.
त्या तरुणाच्या मनावरचे ते व्रण कधीच पुसले गेले नाहीत.
अनेक मुलग्यांनी लैंगिक अत्याचार, शोषणाविषयी बोलताना सांगितलं की, त्यांच्यावर अत्याचार झाला आहे, हे त्यांना तर कळलेलं नव्हतंच पण पालकांनाही कळलं नव्हतं.
म्हणूनच या विषयावर जाणून घेऊ, सकाळ प्लसच्या या लेखातून.