Premium| Criminalization of politics: राजकारणातील गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी केंद्राने १३० वी घटनादुरुस्ती प्रस्तावित केली आहे; मात्र ती फक्त मंत्र्यांवर लागू असून आमदार-खासदारांवर नाही.

Electoral reforms India: गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक प्रतिनिधी बनत असल्याने लोकशाही धोक्यात आहे. ३० दिवस तुरुंगवासाऐवजी चार्ज फ्रेम हा निकष ठेवण्याची मागणी होत आहे
Electoral reforms India
Electoral reforms Indiaesakal
Updated on

डॉ. उदय वारुंजीकर

udaywarunjikar@rediffmail.com

राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखायचे असेल, तर कायद्यात दुरुस्ती आवश्यक आहे. परंतु, प्रस्तावित दुरुस्ती योग्य आहे की अयोग्य याबाबत प्रत्येक नागरिकाने आपले मत तयार करून ते समितीला कळवले पाहिजे. खऱ्या लोकशाही मूल्यांचे रक्षण करायचे असेल, तर कायद्यात दुरुस्ती करावीच लागेल. परंतु, ती प्रस्तावित मसुद्याप्रमाणे करायची की त्यात बदल करायचे, याबाबत सखोल चर्चा होणे आवश्यक आहे.

राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने अनेक निकालपत्रांद्वारे प्रयत्न केलेले आहेत. अशा निकालपत्रांची यादी बनवायची झाल्यास ती खूप मोठी होईल. परंतु, कायदा बनवण्याची जबाबदारी राज्यघटनेतील ‘सेपरेशन ऑफ पॉवर्स’ तत्त्वानुसार कायदेमंडळाची आहे. त्यामुळे भारतीय संसदेने कायदा बनवावा, अशी अपेक्षा सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रांमध्ये नमूद केलेली आहे.

राजकारणातील गुन्हेगारीकरणाला रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी महत्त्वपूर्ण निकाल दिले आहेत. लोकशाहीचे पावित्र्य राखण्यासाठी निवडून आलेले प्रतिनिधी निर्दोष चारित्र्याचे असावेत, असा ठाम संदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तरीही प्रत्यक्षात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली मंडळी राजकारणात प्रवेश करून निवडणुका जिंकताना आणि मंत्रिपदे भूषवताना दिसतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com