Premium| Lata Mangeshkar Jalsa: पहिला जलसा - दीनानाथांच्या आठवणींचा स्वरप्रवास

Dinanath Mangeshkar Memory: या कथेत दीनानाथ मंगेशकर आपल्या स्मृतींच्या गोंधळात हरवलेले आहेत, आणि लता त्यांची काळजी करत त्यांना सावरते. जलशाचा निमित्ताने बाप लेकीमधील भावबंध जिवंत होतो
Lata Mangeshkar
Lata Mangeshkaresakal
Updated on

हृदयनाथ मंगेशकर

saptrang@esakal.com

वाऱ्याचा जोरदार झोत यावा,

आणि रानातला पालापाचोळा रानभर

उधळून, विस्कटून जावा.

आणि शुष्क रेतकण, मृद् गंधकण एकत्र

एकमेकांत गुंफत, स्वचे वेगळेपण विसरून

एकाकार व्हावेत. उडणाऱ्या सर्पासारखे

फुस्स फुस्स करत अदृश्य वाराच व्हावे.

वारीयाच्या लहरीचे, झोताचे रूपांतर

आक्रस्ताळी वावटळीत व्हावे, आणि साऱ्या

रानाला गदगद हलवून सोडावे.

तसे अतीतातल्या स्मरणांचे सुखद, दुःखद,

कटू आठवणींचे झोत बाबांवर आदळले.

अतीतातल्या आठवणींचे, अनुभूतीचे कण.

काही रेतकण, मृद् गंधकण चहूकडे

विखुरले गेले, बाबांचे मन काही सुखद

आठवणींने आनंदित व्हायचे, तर काही

मृद् गंधाच्या आठवणीचे क्षण मृदु व्हायचे.

तर काही सर्पदंशासारखे क्षण, बाबा सहन

करण्याचा प्रयत्न करत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com