Premium|El Nino Impact : दुष्काळ, अन्नटंचाई आणि राजकीय उलथापालथींमागील एल निनोचे वास्तव

Climate Change And History : ‘एल निनो’सारख्या हवामान घटनांचा परिणाम केवळ पाऊस आणि तापमानापुरता मर्यादित नसून, त्यातून दुष्काळ, अन्नटंचाई, आर्थिक संकटे आणि राजकीय उलथापालथी घडू शकतात.
Climate Change And History

Climate Change And History

esakal

Updated on

हर्ष काबरा - saptrang@esakal.com

हवामानाच्या लहरीपणापुढे मानवी यंत्रणा अपुरी पडते, तेव्हा वेगवेगळी साम्राज्ये हादरली जातात. ‘एल निनो’सारखी हवामान घटना अनेकदा नैसर्गिक संकटांबरोबरच भूराजकीय संघर्षांचीही ठिणगी ठरते. वसाहतवादी शोषणापासून ते शीतयुद्धाच्या गुप्त व्यवहारांपर्यंत, पर्यावरणातील अनपेक्षित उलथापालथींनी जागतिक इतिहासात भीषण दुष्काळ, अनेक देशांमधल्या विविध क्रांती आणि विविध सत्तांचे भवितव्य घडवले आहे.

दुष्काळात तेरावा महिना ! मध्यपूर्वेतील तणाव, युक्रेन युद्ध, महागाईचा तडाखा, संरक्षणवाद आणि शुल्क युद्धे यांसारख्या आव्हानांशी जग आधीच झुंज देत असताना आता शास्त्रज्ञांनी ‘सुपर एल निनो’चा इशारा देत मानवनिर्मित हवामान बदलांमुळे २०२७ हे आजवरचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता वर्तवली आहे. ‘एल निनो’मुळे भारतात यंदा मान्सून लांबला असून सरासरीपेक्षा कमी पावसाच्या अंदाजाने चिंता वाढवली आहे. तथापि एल निनो ही केवळ एका हवामान चक्राची कथा नाही. मानवी महत्त्वाकांक्षा, श्रद्धा आणि हतबलतेच्या संगमातून विकोपाला जाणारे हे चक्र दुष्काळ आणि क्रांत्या घडवत जागतिक इतिहासाला वेगळे वळण कसे देऊ शकते, हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे.

शास्त्रज्ञांद्वारे अतितीव्र स्थिती दर्शवण्यासाठी अनौपचारिकपणे वापरल्या जाणाऱ्या ''सुपर एल निनो'' या संज्ञेभोवती ‘निश्चित आपत्ती’चे कोंदण उभे केले जात असले, तरी एल निनो केवळ प्रतिकूलतेची शक्यता वाढवतो, अंतिम फलित ठरवत नाही. त्यामुळे त्याकडे विशिष्ट आपत्तींचे ठाम भाकीत म्हणून न पाहता वाढलेली जोखीम म्हणून पाहणे अधिक सुसंगत ठरते.

एल निनोमुळे पिकांचे नुकसान, अन्नधान्याची टंचाई आणि किमतींमध्ये वाढ होऊ शकते. पूरस्थिती उद्भवल्यास साथींचा उद्रेक होण्याचाही धोका वाढतो. याचा सर्वाधिक फटका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना बसतो. इतिहासातील समांतर घटनांचा संदर्भ उपयुक्त ठरतो; मात्र, भविष्य हे भूतकाळाची हुबेहूब पुनरावृत्ती असेलच असे नाही. हवामानाची पार्श्वभूमी बदलत असते. भारतात स्वातंत्र्यानंतरच्या १६ एल निनो वर्षांपैकी ७ वर्षांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याच्या नोंदी आहेत. स्थानिक परिस्थिती, पायाभूत सुविधा आणि प्रशासनाची परिणामकारकता यांवरच संकटाची तीव्रता आणि परिणती अवलंबून असते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com