Premium| Great Maratha Resurgence: पुरंदरच्या तहात गमावलेले गड मराठ्यांनी कसे परत मिळवले?

Sinhagad Victory to the Loot of Surat: छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७० मध्ये मुघलांविरुद्ध तीव्र मोहीम सुरू केली. पुरंदराच्या तहात गमावलेले अनेक दुर्ग मराठ्यांनी वेगाने जिंकले.
Sinhagad Victory

Sinhagad Victory

esakal

Updated on

केदार फाळके

editor@esakal.com

शिवाजी महाराजांनी १६७०च्या प्रारंभी मुघलांविरुद्ध पुन्हा तीव्र मोहीम आरंभिली. औरंगजेबाला आपला पुत्र मुअज्जम आणि शिवाजी महाराज यांच्यात गुप्त संगनमत असल्याचा संशय आल्याने त्याने प्रतापराव गुजर आणि निराजी रावजी यांना अटक करण्याचा हुकूम सोडला. परंतु शाहजाद्याच्या दरबारातील एका विश्वासू प्रतिनिधीने हा हुकूम पूर्वीच कळविला होता, त्यामुळे मुअज्जमाने निराजी रावजींना सावधान करून मराठा फौजेसह निघून जाण्यास सांगितले.

ते वेगाने शिवाजी महाराजांकडे पोहोचले. औरंगजेबाचे फर्मान औरंगाबादेत पोहोचताना आठ दिवस उलटले होते; त्यामुळे मुअज्जमाने उत्तर पाठविले— ‘मराठे आधीच निघून गेले आहेत.’ या प्रसंगाने शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील दोन वर्षे टिकलेली शांतता संपुष्टात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com