Premium|India Brazil relations : भारत - ब्राझील सहकार्याच्या संबंधांमुळे जगात शांतता निर्माण होईल का?

International trade : भारत-ब्राझील सहकार्यामुळे ‘ग्लोबल साउथ’ला बळ मिळत असून व्यापार आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नवी संधी निर्माण होत आहेत
India Brazil relations

India Brazil relations

esakal

Updated on

डॉ. नरेंद्र पाटील

आयातशुल्काबाबतच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे जागतिक व्यापार-उद्योगजगतात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यात आता युद्धाची भर पडली आहे. अशा स्थितीत भारताच्या विविध देशांबरोबर असलेल्या संबंधांना महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर ब्राझीलबरोबरच्या भारताच्या संबंधांविषयी ‘इंडो-ब्राझील चेंबर ऑफ कॅामर्स’चे संचालक डॉ. नरेंद्र पाटील यांच्याशी गणाधीश प्रभुदेसाई यांनी केलेली बातचीत.

‘ग्लोबल साउथ’ला बळ देणारी मैत्री

प्रश्‍न : ‘इंडो-ब्राझिलियन चेंबर ऑफ कॉमर्स’चे संचालक म्हणून जबाबदारी आल्यापासून महत्त्वाच्या घडामोडींबाबत काय सांगाल?

उत्तर : मी जी२० परिषदेत भाग घेण्यासाठी २०२४मध्ये ब्राझील येथे गेलो होतो. त्या वेळी ‘इंडो-ब्राझिलियन चेंबर ऑफ कॉमर्स’च्या सदस्यांशी ओळख झाली. त्यांच्याशी अनेक विषयांवर सविस्तर चर्चा केली आणि त्यातून पुढे संबंध वाढत गेले. मागील एक ते दीड वर्षात ब्राझीलमधील चार राज्यांतील प्रमुख व प्रतिनिधीमंडळे भारतात येऊन गेली आहेत. भारतामधून दोन वेळा व्यावसायिक प्रतिनिधींनी ब्राझीलला भेट दिली. भारतीय व्यावसायिकांनी शैक्षणिक, फार्मा, माहिती-तंत्रज्ञान, बायोमायनिंग क्षेत्रात करार केले आहेत. ब्राझीलमधील विविध राज्य सरकारांच्या नेतृत्वाखाली आलेल्या प्रतिनिधी मंडळांनी भारतात विशेष करून महाराष्ट्रात संरक्षण, माहिती-तंत्रज्ञान, बायोटेक, कृषी उत्पन्न, मालाची साठवण यात गुंतवणुकीसाठी करार केले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com