

India US trade agreement
esakal
डॉ. माधव शिंदे - अर्थशास्त्राचे अध्यापक
भारत करीत असलेले व्यापारकरार महत्त्वाचे असले तरी त्यातील तरतुदींचा फटका आपल्याकडील शेती आणि पूरक व्यवसाय, सूक्ष्म आणि लघुउद्योग, व्यवसाय यांना बसणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी.
सध्या भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार कराराची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु असून या व्यापारकराराचे भारताच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होणार असल्याचे बोलले जाते. भारताने आजपर्यंत अनेक द्विपक्षीय व्यापार करार केलेले आहेत. अलीकडील काळात न्यूझीलंड, ब्रिटन, युरोपीय महासंघ आणि आता अमेरिका यांच्यासोबत होत असलेले द्विपक्षीय व्यापार करार महत्त्वाचे असून हे करार अंतिम टप्यात पोहोचले आहेत. या व्यापार करारांच्या अंतिम आराखड्यांचा विचार करता, या देशांचा भारतातील औद्योगिक उत्पादनांसोबतच कृषिउत्पादनांच्या बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी प्रयत्न दिसतो. अमेरिका तर त्यासाठी भारतावर दबाव आणत असल्याची स्थिती आहे.