

गिरीश वानखेडे
girishwankhede101@gmail.com
भारताला कथा सांगण्याची समृद्ध परंपरा आहे. जगात सर्वश्रेष्ठ मानली गेलेली आपली चित्रपटसृष्टी देशाची वैविध्यपूर्ण संस्कृती आणि इतिहास मांडणाऱ्या चित्रपटांची निर्मिती करीत आली आहे. बालपणी ऐकलेल्या पौराणिक कथांपासून आटपाट नगरीतील राजांच्या भव्य कथा अन् ऐतिहासिक घटनांचे कथारूप अशा मार्गावरून प्रवास करीत कथाकथनाची भारतीय शैली गेल्या काही वर्षांत विकसित झाली आहे. त्यात रहस्य अन् भयपटांसोबत रोमांचक कथांचाही समावेश झाला. या उत्क्रांतीमध्ये विशेषकरून भयकथा शैलीत लक्षणीय परिवर्तन घडून आले आणि चित्रपट उद्योग नव्या काळाचा प्रतिनिधी बनला.