

India China trade challenge
esakal
भारताकडून स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण आखण्यात येत असले, तरीही यामध्ये चीन हा घटक महत्त्वाचा आहे. अनेक क्षेत्रांमध्ये भारत चीनवरच अवलंबून आहे. चीनच्या निर्यातकेंद्री अर्थव्यवस्थेतील उत्पादनांचे दर आणि प्रमाण यांमुळे जगावर वर्चस्व निर्माण झाले आहे. त्यामुळे भारताच्या स्वदेशी मॉडेलसमोर चीन हे एक आव्हान असणार आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेवर चर्चा करत असताना, चीनच्या वेगवान विकासाची आणि विकासाच्या मॉडलेची चर्चा होत असते. त्यामध्ये चीनकडून निर्यातकेंद्री उत्पादनांवर भर देण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात येतो. भारतामध्ये स्वदेशी अर्थव्यवस्थेचा विचार करतानाही, चीनचा प्रामुख्याने होतो. चीनच्या अर्थव्यवस्थेतील धोरणांची चर्चा करतानाच, भारतामध्ये स्वदेशी उत्पादनांचा विचार करताना चीनच्या स्वस्त आणि मुबलक प्रमाणातील उत्पादनांमुळे असणाऱ्या आव्हानांकडेही गांभीर्याने पाहावे लागते.