

Atmanirbhar Bharat
esakal
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वदेशीच्या आवाहनानंतर आयात-निर्यात,अन्य देशांवरील अवलंबित्व या मुद्द्यांवर चर्चा होत आहे. आत्मनिर्भर अर्थव्यवस्थेचा विचार करत असताना, त्यासाठी आवश्यक बलस्थाने अधिक मजबूत करणेआणि कमकुवत दुव्यांवर जास्त काम करण्याची गरज आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला स्वदेशीसाठी आवाहन केले. नागरिकांनी देशांतर्गत उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे आणि परदेशी उत्पादनांवरील अवलंबित्व कमी करावे, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे, स्वदेशी या मुद्द्यावर चर्चा होत आहे. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या आणि अशांततेच्या काळात प्रत्येक देशाला इतरांवर अवलंबून न राहता आपण ‘आत्मनिर्भर’ व्हावे असे वाटणे, अगदीच नैसर्गिक आहे. यातही अमेरिका आणि चीन यांसारख्या बलाढ्य अर्थव्यवस्थांची आंतरराष्ट्रीय व्यापारातील दादागिरी सहन करण्यापलीकडे जाते, तेव्हा स्वदेशीचा मूलमंत्र हा खूपच आचरणीय वाटतो.