

Maratha reservation protest
esakal
अॅड. श्रीनिवास बिक्कड
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने या प्रश्नावर तोडगा काढणारा शासननिर्णय काढला. मराठा समाजातील अनेक अभ्यासक या निर्णयाचा फायदा होणार नसल्याचे सांगत आहेत, तर ओबीसी समाजातही या निर्णयाबाबत संभ्रम आहे.
लक्ष्मण हाके या निर्णयाची होळी करत आहेत, तर बबनराव तायवडे मात्र स्वागत करत आहेत. राज्यात हा संभ्रम निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडविण्याची जबाबदारी संपूर्णपणे राज्य सरकारची आहे.