Premium|Study Room : भारताच्या परराष्ट्र धोरणातील बदल; आदर्शवादापासून सामरिक स्वायत्ततेपर्यंतचा प्रवास

From Idealism to Realism in Indian Diplomacy : नेहरूंच्या नैतिक आदर्शवादाकडून वास्तववादी सामरिक स्वायत्ततेकडे झालेला भारताच्या परराष्ट्र धोरणाचा प्रवास आणि शीतयुद्धाच्या द्विध्रुवीय जगात अलिप्ततावादी चळवळीद्वारे जागतिक शांततेसाठी भारताने बजावलेली महत्त्वाची भूमिका यावर प्रकाश टाकणारा हा विशेष लेख
From Idealism to Realism in Indian Diplomacy

From Idealism to Realism in Indian Diplomacy

esakal

Updated on

भारताचे परराष्ट्र धोरण सुरुवातीला नैतिकता, आदर्शवाद आणि वसाहतवादविरोधी भूमिकेवर आधारित होते; परंतु कालांतराने ते अधिक वास्तववादी, बहुआयामी आणि राष्ट्रीय हितांवर केंद्रित झाले आहे. स्वातंत्र्यानंतर भारतासमोर केवळ आर्थिक पुनर्बांधणीचे नव्हे, तर आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत स्वतःचे स्थान निश्चित करण्याचे मोठे आव्हान होते. शीतयुद्धाच्या द्विध्रुवीय जगात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणे सोपे नव्हते. तरीही भारताने जागतिक न्याय, शांतता आणि सहअस्तित्व यांचा पुरस्कार करत स्वतःची दिशा ठरवली. जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील सुरुवातीचा दृष्टिकोन अत्यंत नैतिक होता; मात्र बदलत्या जागतिक परिस्थितीत भारताने हळूहळू आपले धोरण पुनर्रचित केले. आजच्या बहुध्रुवीय व्यवस्थेत भारताचे परराष्ट्र धोरण सामरिक स्वायत्तता, बहुपक्षीय सहभाग आणि राष्ट्रीय हितसाधन या तिन्हींचा संतुलित संगम आहे. हा प्रवास भारताच्या परराष्ट्र धोरणातील लवचिकता आणि दूरदृष्टी स्पष्टपणे दाखवतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com