Premium| Marathi Language: मुंबई बदलतेय, पण मराठीची ओळख अबाधित राहू द्या

Mumbai Culture: मुंबईत वाढलेली भाषिक विविधता हे मुंबईचं स्वागतार्ह वैशिष्ट्य आहेच, पण त्यामुळे मराठी भाषा गमावली जाईल तर मुबईची ओळखच नष्ट होईल म्हणून मुंबई म्हणजे मराठी अस्मितेचं प्रतीक आहे
Marathi Identity In Mumbai
Marathi Identity In Mumbaiesakal
Updated on

डॉ. सुलभा कोरे

kore.sulabha@gmail.com

महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई आहे. आमची राजभाषा मराठी आहे. मराठी म्हणजे मुंबईचं जगणं आणि जीवन आहे, मराठीच्या बोलीभाषा म्हणजे मराठीचा विस्तार आहे. असं असताना इतर कुठल्याही भाषांना मराठीच्या बोलीभाषा म्हणून उगाच जोडणं म्हणजे त्या भाषांचाही अपमान आहे आणि मराठीच्या बोलींचाही अवमान आहे. मराठी आमची ‘माय’ आहे, आमची अस्मिता आहे. तिच्या बोलीभाषा म्हणजे आमचे श्वास आहेत आणि आई किंवा श्वास जर दुसऱ्यांना दिले, तर मराठी भाषा आणि मुंबई कुठे असेल?

मुंबईची संस्कृती, रीतीरिवाज बदलत चाललेत. हवामान, वातावरण बदलत चालले. मुंबईची अस्मिता, मानसिकता बदलत चाललीय. महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली, वृद्धिंगत झालेली मुंबईची संस्कृतीही बदलत चालली. तुम्ही तिच्या मातीची, हवेची, रीतीरिवाजाची संस्कृतीची उपज, तिची भाषा आणि बोलीभाषाही बदलवू पाहत आहात, हे अनाकलनीय आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com