
प्रा. संदीप पेटारे
sandypetare@gmail.com
काही माणसं केवळ व्यक्ती नसतात; तर ती अनुभव असतात, स्पंदनं असतात आणि निसर्गाशी जोडणाऱ्या नशिबाच्या धाग्यांसारखी असतात.
अशाच तेजस्वी नावांपैकी एक म्हणजे मारुती चितमपल्ली. त्यांच्याशी झालेल्या भेटी केवळ औपचारिक नव्हत्या; तर त्या होत्या अंतर्मनाशी निसर्गाची ओळख करून देणाऱ्या मौन गप्पा. त्यांच्या तोंडून उच्चारलेला प्रत्येक अनुभव निसर्गाचा श्वास वाटायचा...