वंदना धर्माधिकारी:
प्रत्येक पिढी आपल्या पुढच्या पिढीला नेहमीच काहीतरी देते. तो त्यांचा जिवापाड जपलेला, मायेने वाढवलेला हळवा कोपरा असतो. आपल्या पश्चातदेखील त्यांच्यापैकी कोणालाही त्रास होऊ नये, नात्याची वीण न उसवता अधिक घट्ट होवो हीच भावना मनी ठेवून प्रस्थान करायचे असते. अशी अखेरची कर्तव्यपूर्ती करणे स्वत:ला आणि घरादाराला मोलाचा दिलासा देणारे आहे. यामध्ये नामांकन, इच्छापत्र, पुढल्या पिढीला देणे आपल्या इच्छेप्रमाणे होईल, अशी तजवीज करणे महत्त्वाचे ठरते.