Premium|Mahatma Phule Bicentenary : ...पण गोष्ट अजून संपलेली नाही !

Me Savitribai Jyotirao Phule Serial : महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षात ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिका थांबण्याच्या निर्णयामुळे महाराष्ट्रभरातून तीव्र भावना व्यक्त होत असून फुले विचारांशी असलेले जनतेचे भावनिक नाते अधोरेखित झाले.
Mahatma Phule Bicentenary

Mahatma Phule Bicentenary

esakal

Updated on

डॉ. अमोल कोल्हे - saptrang@esakal.com

महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावरील दूरचित्रवाणीवरील एका वाहिनीवरची मालिका थांबत आहे, मालिका बंद होत असल्याने समाजात तीव्र भावना व्यक्त झाल्या. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या मालिकेचे कर्ते-धर्ते डॉ. अमोल कोल्हे मालिकेसंबंधीचा आणि पुढील वाटचालीचा प्रवास मांडत आहेत...

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका १४ जूनपासून थांबणार असल्याची बातमी समोर आल्यानंतर महाराष्ट्रभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. फोन, संदेश आणि समाजमाध्यमांवर प्रतिक्रियांचा अक्षरशः पूर आला होता. महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दीच्या कालखंडात त्यांच्या जीवनकार्यावर आधारित मालिका बंद होणे अनेकांसाठी वेदनादायी ठरले.

या प्रतिक्रियांमधून एक प्रश्न सातत्याने पुढे येताना दिसला. तो म्हणजे समता, शिक्षण, मानवता आणि सामाजिक परिवर्तनाचा वारसा जपणारा महाराष्ट्र हे निमूटपणे स्वीकारेल का? ज्या फुले दांपत्याने स्त्रियांना, वंचितांना आणि बहुजन समाजाला शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला, त्यांच्या संघर्षाची कथा अर्धवट राहावी हे महाराष्ट्राला मान्य होईल का? मुळात महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी कालखंडात त्यांच्या आयुष्यावरील मालिका थांबणे हीच अनेकांना खटकणारी बाब ठरली. मात्र या संपूर्ण घडामोडीत एक सकारात्मक पैलूदेखील समोर आला. मालिकेवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांनी तिला केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून नव्हे, तर एका विचारप्रवाहाचे माध्यम म्हणून स्वीकारल्याचे स्पष्टपणे दिसून आले. मालिका थांबणार असल्याच्या चर्चेदरम्यान व्यक्त झालेल्या प्रतिक्रिया या केवळ एका दूरचित्रवाणी कार्यक्रमाबद्दल नव्हत्या; त्या फुले दांपत्याच्या विचारांशी असलेल्या भावनिक नात्याच्या होत्या`.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com