
पीतांबर लोहार
राज्यातील सर्वात श्रीमंत महापालिका अशी एकेकाळी ख्याती असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास आराखड्यांनी व नगन नियोजनाने अनेक वळणे घेतली आहेत. १९८२ ला पहिल्यांदा मनपा अस्तित्वात आल्यानंतर पहिला डीपी १९९५ ला झाला.
मात्र लगेच दोन वर्षांनी १८ गावे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. त्यांच्याकरिता स्वतंत्र डीपी करण्यात आला. मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. गुंठेवारी, मनमानी पद्धतीने बांधलेली घरे यांमुळे शहराला बकालपणा आला. शहर मात्र विस्तारत राहिले.