How Business of Marathi artisans who run gold refineries reached in Amritsar
How Business of Marathi artisans who run gold refineries reached in Amritsar

सोन्याच्या व्यवसायात मराठी माणसाची अटकेपार मजल !

मराठी माणूस उद्यमशील आहे. तो बाहेरच्या प्रांतात जाऊन व्यवसाय- धंदा करीत नाही, असे सर्वसाधारणपणे म्हटले जाते. परंतु, तो गैरसमज ठरावा, अशी माहिती पुढे आली आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांतील सोनं आटवणारे कारागिर देशाच्या अनेक राज्यांतील प्रमुख शहरांत जाऊन व्यवसाय करीत आहेत. अगदी ३०-४० वर्षांपासून ते तेथे आहेत. पंजाबमधील अमृतसरमध्ये या तीन जिल्ह्यांतील सुमारे १५० कुटंबे तेथे राहत आहेत. ते तेथे कसे पोचले, व्यवसाय कसा करीत आहेत, स्थानिक संस्कृतीत ते कसे एकरूप झाले आहेत, याचा आढावा घेणारा हा रिपोर्ताज.

पुणे : सोनं आटवणारे म्हणजेच गोल्ड रिफायनरी(gold refineries)चालविणाऱ्या मराठी कारागिरांनी (Marathi artisans) व्यवसाय - धंद्यासाठी केवळ राज्याचीच सीमा ओलांडली नाही तर देशाच्याही बाहेर ते पोचले आहेत. इतकेच नव्हे तर, देशातील प्रमुख राज्यांतील बहुतेक जिल्ह्यांत हे कारागिर पोचले आहेत. अगदी चंदीगड(Chandigarh), अमृतसरमध्येच ( Amritsar ) नव्हे तर, श्रीलंकेतही (Sri Lanka) त्यांची भेट होते. एखाद्या व्यवसायात कुशलता मिळवून परप्रांतात जाऊन काम करण्याची या मराठी हातांच्या जिद्दीची कथा लक्षणीय आहे. (How Business of Marathi artisans who run gold refineries reached in Amritsar)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com