दिवाळखोरीत निघालेल्या कंपनीची मालकी कशी होते हस्तांतरित?
व्यवसाय जोमात असताना त्याचा विस्तार करावा ही प्रत्येक व्यावसायिकाची इच्छा असते. मात्र त्यासाठी लागणारे भांडवल प्रत्येकाकडे असेलच असे नाही. मग अशा वेळी बँकेकडून कर्ज घेण्यात येते. पण व्यवसायाची आर्थिक पत चांगली नसेल तर व्यावसायिकाला अपेक्षित कर्ज मिळत नाही. त्यामुळे दुसरा पर्याय उरतो तो ठेवी स्वीकारण्याचा. व्यवसायातून आलेल्या नफ्यातून बँकेचे कर्ज आणि ठेवीदारांना व्याज देऊ असे नियोजन आखले जाते. ठेवी मिळाव्यात म्हणून आकर्षक परताव्याचे आमिष दाखवले जाते. हा सर्व खटाटोप करून आवश्यक ते भांडवल उभे केले जाते व व्यवसायाच्या वृद्धीस सुरवात होते. मात्र प्रत्येक नियोजन हे आपण केले आहे त्याच पद्धतीने पार पडेल, याची शाश्वती नसते. त्यामुळे अचानक आलेले संकट, कंपनी चालवताना घेतलेले चुकीचे निर्णय, ग्राहकांकडून मिळणारा प्रतिसाद मंदावला अशा एक ना अनेक कारणांमुळे व्यवसायाला घरघर लागते. त्यातून परिस्थिती सुधारली तर ठिक नाहीतर कंपनी दिवाळखोरीत देखील निघू शकते. अशा दिवाळखोरीत निघालेल्या कंपन्यांचे हस्तांतरण कसे होते. दिवाळखोर झालेल्या कंपनीला बँकेने कर्ज दिले असेल तर ते त्यांना परत कसे मिळते. तसेच यासर्वांत ठेवीदारांचे काय होते याचा आढावा या लेखातून घेण्यात येणार आहे.