पत्नीचा अपघाती मृत्यू आणि त्यनंतर काही वर्षांनी आई-वडीलांच्या निधनामुळे ते मानसिकरित्या पूर्णपणे खचले. व्यसनांच्या आहारी गेले आणि त्यांच्या जीवनात काळोख दाटून आला. मात्र, काही दिवसांनी त्यांना स्वत:ची जाणीव झाली आणि या सुंदर जगासाठी आपण काही तरी केले पाहिजे, असे वाटले. त्यानंतर त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी जगाची सायकल यात्रा सुरु केली. मलेशियातील अपघातात गंभीर जखमी होऊनही ते माघारी फिरले नाही. आतापर्यंत त्यांनी ६१ हजार किलोमीटरचा प्रवास सायकलवरून पूर्ण केला असून सध्या ते आपल्या यात्रेतील ६०व्या देशात आहेत. ही कहाणी आहे डॉ. राज ऊर्फ सायकलबाबची..!