धरणांमध्ये बुडालाय मावळ्यांचा गौरवशाली इतिहास

 glorious history of the Mavalas drowned in the dam
glorious history of the Mavalas drowned in the dam

छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) बारा मावळातील मावळे (Mavala) एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली. तसेच, स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगडावरून (Rajgad) स्वराज्याचा विस्तारही केला. मावळातील दगड-माती या इतिहासाच्या आणि मावळ्यांच्या पराक्रमाच्या साक्षीदार आहेत. हा इतिहास (History) ऐकून व वाचून आजही रक्त सळसळते. मात्र, मात्र, स्वराज्याचा आणि त्यापूर्वीचाही गौरवशाली हा इतिहास धरणांच्या (Dam) पाण्यात लुप्त झाला आहे. धरणांचे पाणी ओसरल्यानंतर काही काळापुरता तो पुन्हा उजेडात येतो.(The glorious history of the Mavalas drowned in the dam_


पानशेत धरणाच्या टोकाला असलेल्या ठाणगाव येथील दुर्मिळ अर्धवट कोरलेली लेणी पाहण्यासाठी नुकताच गेलो होतो. या परिसरात पहिल्यांदाच जाण्याचा योग आला होता. या मार्गावर ऐतिहासिक शिरकोली गाव आहे, अशी माहिती होती. येथील मंदिरातील शिरकाई देवीची मूर्ती अत्यंत सुंदर व सुबक आहे, असे ऐकून होतो. त्यामुळे उत्सुकता ताणलेली होती. ठाणगावला जाताना प्रवासात शिरकोली गाव लागले. मात्र, परतीच्या प्रवासात शिरकाई देवीचे दर्शन घ्यायचे ठरले. मात्र, शिरकोली गाव सोडून पुढे गेल्यानंतर धरणाच्या पाण्यातून एका मंदिराचा अत्यंत सुंदर आणि रेखीव असा कळस बाहेर डोकावताना दिसू लागला. उत्सुकतेने पाहिल्यानंतर समजले की, शिरकोली गावातील शिरकाई देवीचे ते मूळ मंदिर आहे. पानशेत धरणात ते बुडाले आहे. देवीचे मंदिर धरणात बुडाल्यामुळे ग्रामस्थांनी धरणाच्या वरच्या भागात वस्ती केलेल्या ठिकाणी नवीन मंदिर उभारून तेथे देवीची स्थापना केली. शिरकोली गावाला मोठा इतिहास आहे. त्याची साक्ष देणारे हे मंदिर धरणात बुडाले आहे. मात्र, धरणाचे पाणी कमी झाल्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये हे संपूर्ण मंदिर उघडे होते.



तर, पुणे जिल्ह्याचा पश्चिमेकडील भाग हा जागतिक वारसा ठरलेल्या पश्चिम घाटात येतो. या परिसरावर निसर्गाने मुक्तहस्त उधळण केली आहे. चार महिने धो-धो पाऊस कोसळत असतो. त्याकाळात या भागातील निसर्गसौंदर्य एवढे खुलते की, त्याची भुरळ सर्वांनाच पडते. पाऊस थांबल्यानंतर उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर सह्याद्री आपले रौद्र रूप धारण करतो. उंचच उंच डोंगर, खोल दऱ्या व घनदाट जंगल असलेल्या या रांगड्या राकट परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. याच भागातील रायरेश्वर पठारावरील रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले आणि एवढेच नव्हे; तर स्वराज्याची पहिली राजधानी असलेला राजगड किल्ला याच भागात आहे. या किल्ल्यावरून महाराजांनी सुमारे अनेक वर्षे आपला राज्यकारभार हाकला. त्यामुळे या परिसराचे इतिहासात मोठे स्थान आहे. या भागातील मावळे महाराजांसाठी तळहातावर प्राण घेऊन लढले. या भागातील दगड, माती, नदी, ओढे, वाडे, महाराजांच्या या इतिहासाचे साक्षीदार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com