प्रीमियम महाराष्ट्र
Shivrajyabhishek Sohala : केवळ महाराष्ट्रातच नाहीतर अगदी तमिळनाडूपर्यंत किल्ले उभारणारे दुर्गाधिपती श्रीशिवछत्रपती !
केवळ मनुस्मृतीच नाही, तर वेद-पुराणांपासून ते रामायण, महाभारत अशा अनेक ग्रंथांमध्ये किल्ल्यांबाबतचे उल्लेख आढळतात.
केवळ मनुस्मृतीच नाही, तर वेद-पुराणांपासून ते रामायण, महाभारत अशा अनेक ग्रंथांमध्ये किल्ल्यांबाबतचे उल्लेख आढळतात. भारतात राज्य करणाऱ्या अनेक राज्यकर्त्यांनी त्या त्या भौगोलिक स्थितीचा, राज्यावर येणाऱ्या संकटांचा, जवळ असलेल्या साधनसंपत्तीचा विचार करून किल्ल्यांची उभारणी केलेली आहे. काही ठिकाणी त्याचा लढाईसाठी, संरक्षणासाठी, देखरेखीसाठी... तर काही ठिकाणी त्याचा राहण्यासाठी वापर केला गेला. यातील बहुतांश किल्ल्यांना फार मोठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. या किल्ल्यांभोवतीच भारताचा इतिहास घडलेला आहे.