अडीच वर्षांनी पोहचला तो घरी....!

Lost Man
Lost Man

वय वर्ष ४५. सात वर्षांत त्याने दोनदा घर सोडलं. महाराष्ट्र (Maharashtra)आणि दिल्ली फिरल्यानंतर अचानक त्याचा एके दिवशी अपघात झाला. चार वर्षांनीच तो कुटुंबियांना मिळाला. ते ही दिल्लीसारख्या (Delhi)शहरातून. दुसऱ्यांदा अडीच वर्षापूर्वी तो घर(Home) सोडून निघून गेला. तो ही चालत. ना एस.टी ना बसचा आधार. एवढ्या मोठ्या शहरांमधूनही कित्येक वर्षांनी तो कुटुंबियांना पुन्हा सापडला. ते ही पिंपरी-चिंचवड सारख्या शहरातून. परंतु, त्याच्यावर कुणी करणी केली म्हणून नातेवाइक बोलू लागले. परंतु, विस्मयकारकच माहिती समोर आली. ती अशी...(Hasib Ahmad Lost Two Times Due To Mental Stress and Depression)

मूळ बिहारमधील गया येथील हसीब अहमद(Hasib Ahmad). गाव वारीस नगर. हसीब हा लहानपणापासून गावात काढ्यांची औषधं बनवून विकत असे. स्वभावाने शांत. मितभाषी. विवाह न करताच तो गावात राहिला. परंतु, कालातंराने त्याच्या आई-वडील दोघांचाही कोरोना काळात मृत्यू झाला. त्याचे छत्रच हरपले. त्याला नैराश्य (Depression)आले. आयुष्यात सर्व गमावल्याने तो एकटा पडला. त्यामुळे दिवसेंदिवस त्याचा ताणतणाव वाढला. भाऊ आणि बहिण व भाच्यासोबत तो राहू लागला. जेमतेम पैसेही कमवत असे. मिळालेल्या कामधंद्यातून त्याचा उदरनिर्वाह होत असे. अचानक २०१२-१३ साली रात्रीचा तो घरातून बाहेर पडला. मानसिक ताण सहन न झाल्याने. कोणालाही न सांगता. प्रचंड तणावाखाली तो गेला. त्याला काय करतोय किंवा कुठे चाललो याचेही भान राहिले नाही. शेवटी रस्तोरस्ती फिरुन तो आणखीनच मनोविकृत झाला. त्यावेळी तो दिल्लीतील रस्त्यांवर रोज फिरत असे. कुटुंबियांनी तो न मिळण्याची आशाच सोडून दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com