साहित्य संमेलनांची खरंच आवश्यकता आहे?
साहित्य संमेलनांची खरंच आवश्यकता आहे?- Esakal

साहित्य संमेलने नक्की कशासाठी.....?

कोणतेही साहित्य संमेलन म्हटले की त्याचे उद्घाटन कोण करणार यापेक्षा संमेलन भरवणारी संस्था कोणती आणि स्वागताध्यक्ष कोण याचीच जास्त उत्सुकता असते. राजकीय व्यक्तींनी साहित्याच्या व्यासपीठावर यायला काहीच हरकत नाही. परंतु यामध्ये किती प्रमाणात हस्तक्षेप करायचा याची सीमारेषा ठरवली पाहिजे


उदगीर येथील बहुचर्चित ९५ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन नुकतेच पार पडले. नाशिक येथील साहित्य संमेलनाचे कवित्व संपत नाही, तोपर्यंत उदगीरचे साहित्य संमेलन सुरूही झाले होते. अवघ्या चार महिन्यांचा अवधीत साहित्य संमेलन भरविण्याचा अट्टहास कशासाठी केला, याचे समर्थनीय उत्तर अखिल भारतीय साहित्य महामंडळाला उत्तर देता आलेले नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला मोठी परंपरा आहे. काही वर्षांचा अपवाद वगळता दरवर्षी हा साहित्य मेळा आयोजित केला जातो. परंतु दिवसेंदिवस या संमेलनाला आलेले उत्सवी स्वरूप पाहता अशा साहित्य संमेलनांची खरंचच आवश्यकता आहे का, असा प्रश्न पडतो. (whether Marathi Literary Meet really needed)

न्यायमूर्ती रानडे यांनी १८६५मध्ये मराठीत (Marathi Language) प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांचा (Books) आढावा घेतलेला दिसतो. ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने, तसेच त्यावर एकत्र येऊन विचार विनिमय करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने १८७८च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यानुसार ११ मे १८७८ रोजी पुण्याच्या (Pune) हिराबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले. याला पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणून ओळखले जाते. या संमेलनाचे अध्यक्ष पद न्या.रानडे यांनीच भूषविले होते

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com