
पाकिस्तानी लेफ्टनंट कर्नलला पद्मश्री का?
यंदाच्या पद्मश्री वितरण सोहळ्यात एक नाव पुकारलं गेलं ते म्हणजे ‘लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) काझी सज्जाद अली जहीर’. बऱ्याच जणांना ही व्यक्ती कोण हा प्रश्न पडला असेल. १९७१च्या युद्धात ते पाकिस्तानी सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदावर होते. आता तुम्ही आणखी गोंधळात पडला असाल. पाकिस्तानी सैन्यातील लेफ्टनंट कर्नलला मोदी सरकारने ‘पद्मश्री’ का दिलं? हे काय प्रकरण आहे? पाकिस्तानी सैन्यात राहून काझी सज्जाद अली जहीर यांनी भारतासाठी केलेल्या कामाचा गौरव म्हणून केंद्र सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ बहाल केले. त्यांचा जन्म ११ एप्रिल १९५१रोजी झाला. त्यांनी भारतासाठी नेमकं काय केलं, हे आपण जाणून घेऊ या...
१९७१ च्या युद्धाच्या वेळी पाकिस्तानी सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदावर असलेला २० वर्षांच्या काझी सज्जाद अली जहीर यांनी आपल्या बुटांमध्ये पाकिस्तान लष्कराचे महत्त्वाचे गुप्त कागदपत्र आणि नकाशे लपवून पंजाबमधून भारताच्या हद्दीत प्रवेश केला. त्यांनी सोबत आणलेली सगळी माहिती भारतीय लष्कराला त्या युद्धात खूप मोलाची ठरली. बांगलादेश मुक्तिसंग्रामात त्यांनी ‘मुक्ती वाहिनी’च्या तरुणांना सशस्त्र युद्धाचे प्रशिक्षण दिले आणि हेच लेफ्टनंट कर्नल बांगलादेश मुक्ती युद्धावरील स्वतंत्र संशोधक आणि लेखक झाले. बांगलादेश सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पद्मश्री हा नागरी सन्मान दिला आहे. सज्जाद अली भारताच्या हद्दीत शिरले तेव्हापासून पाकिस्तान सरकारने जारी केलेले वॉरंट त्यांच्या डोक्यावर आहे. हा काळ आता सुमारे ५० वर्षांचा झाला आहे.
हेही वाचा: अशांत आफ्रिका
आम्हाला फक्त मोदी-शहांचा मुस्लिमविरोध दिसतो. पण प्रत्यक्षात देशसेवेत म्हणा किंवा सामाजिक क्षेत्रात असणाऱ्या मुस्लिमांना खऱ्या अर्थाने प्रकाशात आणण्याचं काम सरकारने केलं आहे.
भारत-पाकिस्तान दरम्यान १९७१ मध्ये झालेल्या युद्धापूर्वी पाकिस्तानने बांगलादेशमध्ये भीषण अत्याचार करून हजारो लोकांच्या हत्या केल्या होत्या. यामुळे बांगलादेशमध्ये पाकिस्तानविरुद्ध संतापाची लाट होती. पाकिस्तानी सैनिकांनी हजारो बांगलादेशी महिलांवर बलात्कार केले. यानंतर बांगलादेशात पाकिस्तानविरुद्धची आग भडकली. त्यावेळी लेफ्टनंट कर्नल जहीर यांनी भारतीय सैनिकांबरोबर हातमिळवणी करून पाकिस्तानविरुद्ध एक खास व मोठ्या ऑपरेशन नियोजन केलं. बांगलादेशच्या स्वातंत्र्यापूर्वी लेफ्टनंट कर्नल जहीर पाकिस्तानी लष्करात मोठे अधिकारी होते. पण, पाकिस्तानी सैऩ्याने बांगलादेशवर केलेल्या अत्याचारांमुळे लेफ्टनंट कर्नल जहीरसारखे अधिकारी ते सहन करू शकले नाहीत.
हेही वाचा: दहा हजार घोड्यांचा ‘जीव टांगणीला’
भारतीय लष्कराच्या एका अहवालानुसार, लेफ्टनंट कर्नल जहीर यांनी तेव्हा पाकिस्तानी लष्कराविरुद्ध बंड करून अनेक महत्त्वाची कागदपत्रे भारताच्या हवाली केली. त्यामुळे युद्धात पाकिस्तानी सैन्याची पूर्व पाकिस्तानमध्येच पूर्णपणे तुटली. एवढंच नाही तर, बांगलादेशला नवीन देश बनविण्यासाठी लेफ्टनंट कर्नल जहीर यांनी भारतीय सैन्यांबरोबर काम करून मुक्ती वाहिनीच्या हजारो तरुणांना लष्करी प्रशिक्षण दिलं. यामुळे पाकिस्तानचा जळफळाट झाला आणि त्यांनी लेफ्टनंट कर्नल जहीर यांना जीवे मारण्याचा वॉरंट जारी केला होता. पण लेफ्टनंट कर्नल जहीर यांनी हार मानली नाही.
आपल्या मोहिमेबद्दल बोलताना एकदा लेफ्टनंट कर्नल जहीर यांनी म्हटलं होतं, ‘मला मृत्युदंडाची सजा सुनावण्यात आली होती. पण मी पळून भारतात येण्यास यशस्वी ठरलो. त्यानंतर भारतीय लष्कराने माझे रक्षण केलं. नंतर मला मुक्ती वाहिनीचा प्रशिक्षक बनवला.’’
हेही वाचा: सावधान, फेसबुक, इन्स्टाग्रामवरील तुमच्या फोटोंचा होऊ शकतो गैरवापर !
पाकिस्तानविरुद्ध १९७१ मध्ये राबविलेल्या ऑपरेशन गोरिला’मध्ये लेफ्टनंट कर्नल जहीर यांनी भारतीय सैन्याबरोबर योग्य समन्वय ठेवून काम केलं आणि नंतर त्यांनी मुक्ती वाहिनीच्या सैनिकांबरोबर पाकिस्तानविरुद्ध युद्ध पुकारलं.
लेफ्टनंट कर्नल जहीर म्हणतात, आम्ही १०९७ मध्ये गोरिला ऑपरेशन सुरू केलं आणि पाकिस्तानी सेनेचे जास्तीत जास्त नुकसान करण्यासाठी एका तोफखान्यातील बॅटरी काढली. कारण त्यांना मानवाधिकाराचं उल्लंघन करण्यापासून रोखणे महत्त्वाचं होतं. एका जागी सरकारी कार्यालयात पाकिस्तानी सैन्याने काही महिलांना बंदी करून ठेवलं होतं. जिथे त्यांच्यावर शारीरिक अत्याचार केले जात होते. त्यावेळी तेथील महिलांना पाकिस्तानी सैनिकांच्या तावडीतून सोडविले.रत्नाची दुःखद कहाणी१९७१ च्या युद्धाची आठवण सांगताना लेफ्टनंट कर्नल जहीर म्हणतात, १६ डिसेंबरला पाकिस्तानी सैन्याने ढाक्यात आत्मसमर्पण केल्यानंतर भारत-पाक युद्ध संपलं. पण मला एका मुलीची आठवण येत होती. तिने मरण्यापूर्वी स्वतःचं नाव एका भिंतीवर ‘रत्ना’ असे लिहिलं होतं. कुरीग्राम जवळील एका गावात आम्हाला सांगण्यात आलं की रत्ना नावाच्या मुलीचे पाकिस्तानी सैन्याने अपहरण केलं आहे. त्यानंतर तिचा कुठेच शोध लागला नाही. पण जेव्हा एक कँप पाकिस्तानी सैन्यांच्या तावडीतून आम्ही मुक्त केला तेव्हा एका भिंतीवर रक्ताने ‘रत्ना’ असं लिहिलेलं दिसलं.
हेही वाचा: अंटार्क्टिकाचे भवितव्य
घराला लावली आगपाकिस्तानी सैन्याने केलेल्या जुलूम व अत्याचारासंबंधी सांगतात लेफ्टनंट कर्नल जहीर म्हणतात, पाकिस्तानी लष्कराने त्यांना मारण्याचा हुकूम जारी केला होता. त्यामुळे ते पळून भारतात आले. यानंतर पाकिस्तानी सैन्याने खालची पातळी गाठून माझ्या आई व बहिणीला लक्ष्य केले. पण तेथून पळून जाण्यात दोघी यशस्वी ठरल्या. पाकिस्तानी सैनिकांनी त्यांच घर पूर्णपणे जाळून टाकलं.लेफ्टनंट कर्नल जहीर १९६९मध्ये पाकिस्तानी लष्करात भरती झाले. प्रशिक्षणादरम्यान त्यांना वेगवेगळ्या भागात पाठविण्यात आले होते. पाकिस्तानात काहींच्या बाबतीत भेदभाव करण्यात येत होता. लेफ्टनंट कर्नल जहीर यांचे प्रशिक्षण इतरांपेक्षा वेगळं होतं. जे सैनिक बांगलादेशमध्ये राहणारे होते (तेव्हचं पूर्व पाकिस्तान) त्यांची जासूसी केली जायची, त्यांच्यावर नजर ठेवली जायची, जबरदस्तीने उर्दू बोलायला लावलं जायचं, शिव्याही दिल्या जायच्या. पूर्व पाकिस्तानमध्ये जिथे पाकिस्तानी सैनिक नरसंहार करत होते, त्यांच्याविरुद्ध पूर्व पाकिस्तानमधील सैनिक बंड करू शकतात, अशी पाकिस्तानला भीती होती.
कट्टरपंथीसंबंधी प्रसिद्ध एका अहवालानुसार लेफ्टनंट कर्नल जहीर अजूनही काही कट्टरपंथी संघटनांच्या हिट लिस्टवर आहेत. २०१६ मध्ये जेव्हा ‘आयएसआय’मध्ये सामील होण्यासाठी काही बांगलादेशी जाऊ लागले तेव्हा लेफ्टनंट कर्नल जहीर यांनी त्याविरुद्ध जोरदार मोहीम आखली. या मोहिमेला बांगलादेशी युवकांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला.लेफ्टनंट कर्नल काझी सज्जाद अली जहीर आजही म्हणतात की, आमचा देश तोपर्यंत सुरक्षित आहे, जोपर्यंत आम्ही आमच्या लोकांना कट्टरपंथी व बांगलादेशी विरोधकांपासून सुरक्षित ठेवणार. पाकिस्तानी मॉडेलला स्वीकारण्याची इच्छा ठेवणाऱ्या लोकांनाही आम्हाला दूर ठेवावे लागेल.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”