प्रीमियम पॉलिटिक्स
'हिंदुत्व' सिद्ध करण्यासाठीच वाराणसीची निवड
काशी विश्वनाथ कॉरिडॉरची घोषणा २०१४ मध्ये करण्यात आली होती
महेश बर्दापूरकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ सालची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी वाराणसीची निवड केली. तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पंतप्रधानांनी हा मतदारसंघ निवडण्यामागं उत्तरेतील हिंदी मतदारांच्या जवळ पोचणं, तसंच भारतातील सर्वांत प्राचीन तीर्थक्षेत्राला निवडून आपल्या धार्मिकतेचा आणि हिंदुत्ववादी असल्याचा पुरावा देण्याचा उद्देश असल्याचे मानलं गेलं. नरेंद्र मोदी गेली आठ वर्षं या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करीत आहेत व या कालावधीत त्यांनी तुफान विकासकामं केली आहेत. काशी विश्वनाथ कॉरिडॉर हे त्याचे सर्वांत मोठे उदाहरण असून, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वाराणसी शहरातील आठपैकी आठ मतदारसंघांत भाजपचे उमेदवार विजय झाल्यानं पंतप्रधानांनी शहराच्या विकास केल्याचं मतदारांना मान्य असल्याचं द्योतक ठरावं.