

Why Fear-Based Empires Eventually Collapse
E sakal
हर्ष काबरा
सत्ता माणसामध्ये अभेद्य असल्याचा भ्रम निर्माण करते. पण इतिहास सांगतो, की फक्त दमनशक्तीवर उभारलेली सत्ता टिकाऊ नसते. ती वरून मजबूत दिसते, पण तिचे पाय मातीचे असतात. राजकारणाचा महान विचारवंत आणि तत्त्वज्ञ निकोलो मॅकिॲव्हेली (इ.स. १४६९–१५२७) याने याच गोष्टीचा इशारा दिला होता.
भीती आणि हिंसेने पिळून घेतलेल्या मौनाची शांतता तात्पुरतीच असते. लोक थोडे दिवस दडपतात; परंतु आतली चीड, राग, अपमान, शांतपणे साचत राहतात. मग एक दिवस तो ज्वालामुखीसारखा फुटतो. त्या क्षणी, सर्वशक्तिमान वाटणारा शासकही कोसळतो.
आजचे हुकूमशहा हा धडा विसरलेले दिसतात.