
आशुतोष
मतदार यादीमध्ये फेरफार करण्यात आल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. त्यामुळे, प्रथमच निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यावर चौकशी करण्याऐवजी निवडणूक आयोग आणि भाजपकडून या प्रश्नापासून पळ काढण्याचा प्रयत्न होत आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी १७ ऑगस्टपासून बिहारमधून ‘व्होटर अधिकार रॅली’ला सुरुवात केली आहे. ही रॅली १६ दिवस चालणार असून, देशामध्ये भाजप मतदानाची चोरी करून कशा निवडणुका जिंकते, हा संदेश राहुल गांधी जनतेपर्यंत पोहोचवणार आहेत.