Ramsej Fort

Ramsej Fort

esakal

Premium|Ramsej Fort: रामशेज किल्ल्याच्या शौर्यगाथेचा इतिहास: मराठ्यांच्या धैर्याची अमर कहाणी

Maratha history: रामशेज किल्ला हा मराठ्यांच्या शौर्याचा आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या युद्धनितीचा जिवंत पुरावा आहे. नाशिकपासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या या गिरीदुर्गाने तब्बल साडेसहा वर्षे औरंगजेबाच्या प्रचंड सैन्याला रोखून धरले.
Published on

नाशिकपासून जवळ असलेला रामशेज किल्ला मराठ्यांच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या उत्तम युद्ध नियोजनाचे तो उदाहरण आहे... शिवस्वराज्याचा मानबिंदू आहे. अत्यल्प साधनांच्या मदतीने बलाढ्य शत्रूविरुद्ध कसे लढायचे, याचे प्रेरणास्थान म्हणजे रामशेज किल्ला. सह्याद्री रांगांतील दुर्गम भौगोलिक परिस्थितीचा उपयोग करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. लाखोंच्या संख्येने आलेल्या मोगल सैन्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी धैर्याच्या, शौर्याच्या, चातुर्याच्या आणि सह्याद्रीच्या मदतीने पराभूत केले. त्यांनी बुद्धिचातुर्याने भौगोलिक परिस्थितीचा लोककल्याणासाठी उपयोग करून घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाला वाटले, की आपण सहजच त्यांचे स्वराज्य जिंकून घेऊ.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com