
भवताल वेध। अरविंद रेणापूरकर
भारतातील शिक्षण व्यवस्था जागतिक दर्जाची असली, तरी पुरेशा प्रमाणात सुविधा नसल्याने आर्थिक पत बाळगून असणारे विद्यार्थी परदेशात शिक्षणाची कास धरतात. अशावेळी भारताचे ‘ब्रेन ड्रेन’ होतेच, शिवाय भारतातून मोठी गंगाजळीही परकीयांच्या खिशात जाते. ही स्थिती एकप्रकारे भारतीय अर्थव्यवस्थेला नुकसानकारच आहे. अमेरिकाच नाही तर अन्य देशांतही शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे.