सद्गुरू
महाशिवरात्र, ‘शिवाची महान रात्र’ ही भारताच्या आध्यात्मिक दिनदर्शिकेतील सर्वांत महत्त्वाची घटना आहे. महाशिवरात्र इतकी महत्त्वाची का आहे आणि ती कशी साजरी करता येईल, याविषयी...
भारतीय संस्कृतीत एकेकाळी वर्षातून ३६५ सण साजरे होत असत. हे ३६५ सण वेगवेगळ्या कारणांसाठी आणि जीवनाच्या वेगवेगळ्या उद्देशांसाठी साजरे होत असत. विविध ऐतिहासिक घटना, जय किंवा जीवनातील काही विशिष्ट परिस्थिती म्हणजे शेतातील पेरणी, पिकांची कापणी वगैरे प्रत्येक प्रसंगासाठी एकेक उत्सव असायचा. पण महाशिवरात्रीचे महत्त्व वेगळे आहे.