भूषण महाजनआज बाजार अशा पातळीवर आहे, की गुंतवणूकदाराने कुठला शेअर घ्यावा हा विचार करायच्या ऐवजी कुठला घेऊ नये आणि कुठला विकावा हा विचार करणे आवश्यक आहे. शेअर बाजारात संधी नाहीत असे मुळीच नाही. विमा क्षेत्र निवेशकांना हाक मारते आहे. .गेला आठवडा, नव्हे, खरेतर सारा जून महिनाच अविस्मरणीय असा गेला. लोकसभा निवडणुकीचे निकाल ज्या दिवशी जाहीर झाले (ता. ४ जून), त्या दिवशी बाजार कोसळला खरा, पण तेव्हापासून त्याने फारसे मागे वळून पाहिले नाही. मागच्या सप्ताहात तर रोजच निफ्टी वर जात होती. २४ जूनला २३३५०वरून निफ्टीची गाडी जी सुटली, ती २८ तारखेला २४००० अंशालाच थांबली. आम्ही सतत लार्जकॅप्सची आळवणी करत होतो; जून महिन्यात रिलायन्स ११ टक्के व त्याचे तितकेच महाकाय भाऊबंद एचडीएफसी बँक, इन्फोसिस, अल्ट्राटेक तसेच वर गेले. साऱ्यांनीच समाधान दिले. मागील आठवड्याच्या लेखात (अगर डर है... तो कोई डर नही, ता. ६ जुलै) निर्देशलेल्या निफ्टीच्या व सेन्सेक्सच्या पातळ्या - २४००० व ७९००० सर झाल्या. आता पुढे काय? लार्जकॅप शेअर वर जात होते, म्हणून स्मॉल व मिडकॅप शेअर थांबले म्हणावे, तर तेही महिनाभरात ८-९ टक्के वर गेले. उर्दू कवी अहमद फराजचा एक शेर सांगतो :हयात ले के चलो, काएनात ले के चलोचलो तो सारे ज़माने को साथ ले के चलोतेजीत शेअर बाजाराचे सर्वच घटक सामील झाले. छोट्या मोठ्या गुंतवणूकदारांची चांदीच (की सोने) झाली. कंपन्यांचे प्रवर्तकदेखील वाढीव तेजीचा लाभ घेत शेअर विकून मालेमाल झाले. म्युच्युअल फंडांनी यशाचे नवे तुरे रोवले, तर सरकारही आपल्या भाकिताप्रमाणे बाजार वर गेला, यावर स्वतःची पाठ थोपटून घेते झाले. सारा जमाना खूश हुआ!शेअर बाजारात पैसे कमावणे इतके का सोपे असते? नक्कीच नाही. बातम्यांवर वर-खाली होणारा बाजार पाहून गुंतवणूकदारांनी अधिक सावध राहायला हवे. कारण शेअर बाजारात संधी शोधावी लागते. इतकी सहज संधी मिळत असेल, तर कधी दगाफटका होईल ते सांगता येणार नाही. बाजार कधी गळ्यात चुकीचा माल अडकवून टाकेल ते कळणार नाही. असो.दिवस बदलले आहेत, हे नक्की! पूर्वी एखाद्या कंपनीने विस्तार योजना जाहीर केली, की विस्तार कार्यान्वित होऊन, वाढीव उत्पादन बाजारात जाऊन, विक्री त्या प्रमाणात वाढायला किती वेळ जाईल हे सांगता येत नाही, हे बाजाराला कळायचे. त्यानंतर तो शेअर कोल्ड स्टोरेजमध्ये जायचा आणि प्रत्यक्ष उत्पादन सुरू झाले, की त्यात धुगधुगी यायची. आजकाल कंपनीने नवा प्लांट टाकला हे बाजाराला कळायचाच अवकाश, की तो शेअर धावायला लागतो. रंगात आलेल्या बाजारातून नवे भांडवल उभे करणेही फारसे कठीण राहिले नाही. क्यूआयपी पद्धतीने अगदी बाजारभावालाच पैसे उभे राहतात. पूर्वीसारखे कर्ज व राईट इश्यूवर अवलंबून राहावे लागत नाही. मात्र आधीच नुसती बातमी ऐकून वाढलेला हा शेअर नंतर मनाजोगा नफा झाला नाही तर सुस्तावतो. बाजारात अपेक्षाभांगाला मोठी शिक्षा आहे. रसायन क्षेत्रातील कंपन्यांचेच उदाहरण घेऊ. कोविडनंतर जगाने चीनऐवजी भारताकडे बघायला सुरुवात केली. उत्पादन क्षमता पुरी पडेना म्हणून सर्वांनी विस्तार योजना आखल्या. शेअरचे भाव तीन वर्षांत काही पट वाढले. आता या वाढीव क्षमतेचा खर्च, आणि त्यानुसार मिळायला हव्यात तशा ऑर्डर्स हातात नसल्यामुळे ह्या क्षेत्रातील तेजी अचानक कुठे विरली ते कळत नाही. संयम ठेवून दोन वर्षे वाट बघितल्यास पुन्हा पैसे वाढतीलही, पण तोपर्यंत शेअर बाजार वर गेला पण मी घेतलेले ह्या क्षेत्रातील ब्लू चीप शेअर वाढले नाहीत, हे दुःख कुरवाळत बसावे लागेल. .रेल्वे व संरक्षण क्षेत्रात हेच होत आहे. मोठ्या सरकारी ऑर्डर, वाढीव उत्पादन आणि त्यासाठी मोठी भांडवल उभारणी. हे सगळे होत असताना भाव मात्र काही पट वाढले आहेत. रसायन क्षेत्र जात्यात असेल, तर हे क्षेत्र सुपात आहे. आज गुंतवणूक करून अल्पकाळात पैसे मिळतीलही, पण केव्हा बाहेर पडायचे ते ठरवता आले पाहिजे. ते ठरले नाही तर पुढची दोन तीन वर्षे दृढीकरणात जातील. ह्या दोन्ही क्षेत्रांत गुंतवणूक करताना चार वेळा विचार करावा. अगदीच राहवत नसेल तर ट्रेडिंगसारखी किंवा किमान पाच वर्षांसाठी गुंतवणूक (मधल्या काळात भाव न पाहता) करता येईल.वर म्हटलेली विस्तार योजना जाहीर झाल्यानंतर होणारी तेजी बघता, तशीच स्थिती एका कंपनीने दुसरी कंपनी ताब्यात घेतली की होते. आजकाल दोन्ही शेअर वाढतात. सहसा विकत घेणाऱ्या कंपनीचा भाव कमी व्हायला हवा, कारण दुसरी कंपनी घेण्यास भांडवल उभे करावे लागते, ते गंगाजळीतून किंवा कर्ज काढून उभारावे लागते. तो खर्च वर्ग करताना नफा कमी होणार हे नक्की! पण आजचा बाजार ते बघत नाही. बॉश कंपनीने नुकतेच व्हर्लपूलमधील हिस्सा घ्यायचे ठरवले. बॉश ६ टक्के वाढला, तर व्हर्लपूल ९ टक्के. तसेच जेएसडब्ल्यू इन्फ्राने नवकार कॉर्पचा ७० टक्के हिस्सा घेतला. दोन्ही शेअर वाढले. अल्ट्राटेकने इंडिया सिमेंट घ्यायचे ठरवले, दोन्ही शेअर अनुक्रमे ५.४ टक्के व ११ टक्के वाढले. आता याला काय म्हणावे?आज बाजार अशा पातळीवर आहे, की गुंतवणूकदाराने कुठला शेअर घ्यावा हा विचार करायच्या ऐवजी कुठला घेऊ नये आणि कुठला विकावा हा विचार करणे आवश्यक आहे.शेअर बाजारात संधी नाहीत असे मुळीच नाही. विमा क्षेत्र निवेशकांना हाक मारते आहे. गेली तीन वर्षे त्यातील शेअर हललेले नाहीत. ह्या क्षेत्रात आपला एलआयसीचा शेअर पी/ई गुणोत्तरात सर्वात स्वस्त आहे. पण सरकारी मालकी, अत्यंत भक्कम कर्मचारी संघटना व वेळोवेळी सरकारच्या मदतीला धावून जाण्याची तत्परता बघता, एलआयसीच्या शेअर भांडारात काय दडले आहे ह्याचा अंदाज करता येत नाही. अदानी समूहाचा काही हिस्सा असल्यामुळे हिंडेनबर्ग अहवाल व आरोपानंतर हा शेअर कोमेजला होता, पण आता ते किटाळ दूर झाले आहे. एलआयसीची विश्वासार्हता व नाममुद्रा अतुलनीय आहे. नवीन तंत्रज्ञान स्वीकारून पुढील मजल मारता आली, तर यासारखा शेअर नाही. तरी भाव वाढल्यास सरकार भांडवल विक्री करण्याची टांगती तलवार डोक्यावर आहेच. आपल्या रडारवर ठेवू शकतो, पण हात राखून! .या पलीकडे बघायचे झाल्यास स्टार हेल्थचा जरूर अभ्यास करावा. खासगी विमा कंपन्यांत असलेले मूल्यांकन (पी/ई ३८) वाजवी आहे. बाजार भांडवल मूल्य ₹ ३३ हजार कोटी आहे. खासगी आरोग्यविमा क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर असलेली ही कंपनी १८ टक्के दरसाल चक्रवाढ पद्धतीने प्रीमियम गोळा करीत आहे. गेल्या वर्षी तिने ₹ १५ हजार कोटी रुपयांचा प्रीमियम गोळा केला. सर्व नामांकित व दिग्गज खासगी कंपन्यांच्या तुलनेत हा आकडा किमान दुप्पट- तिप्पट आहे. (एचडीएफसी इर्गो ५९७५, तर बजाज ६७१३, आयसीआयसीआय ६४०० कोटी) सात लाखांवर एजंट्स, १५ हजार कर्मचारी व सर्वसामान्य जनतेचा विमा संरक्षक अशी ओळख असलेली ही कंपनी डिसेंबर २०२१मध्ये सूचीबद्ध होताना तिचा भाव ₹ ९४० होता. आज भाव₹ ५६० आहे. तोट्यातून नफ्याकडे वाटचाल झाली असल्यामुळे पुढे ठोस वाढती विक्री व नफावृद्धी दाखवू शकते. आजही झुनझुनवाला कुटुंबीयांकडे १८ टक्के मालकी आहे. आपल्या सल्लागाराला विचारून निर्णय घ्यावा.पूर्वी लोक सिनेमागृहात चित्रपट पाहत. पैसे पूर्ण वसूल व्हावे म्हणून ‘The end’ची पाटी दिसेपर्यंत जागेवरून हलत नसत. आमच्या शेअर बाजाराच्या खेळाला The end नाही. खेळ अव्याहत चालूच राहणार आहे. मालिका एकामागे एक सतत सुरू असतात तसा. घरी टीव्हीवर सिनेमा बघताना जसा अधून मधून आपण ब्रेक घेतो, तसा बाजारातूनही एखादा छोटा ब्रेक घ्यायला हवा. पुन्हा येऊन बसावे. असो.शेअर बाजारात सावध आशावाद ठेवावा. बाजार कधीही कुठल्याही कारणाने किमान ५ टक्के पडू शकतो, हे गृहीत धरावे म्हणजे गुंतवणुकीत अपेक्षाभंग होणार नाही.(भूषण महाजन शेअर बाजाराचे विश्लेषक आहेत.)महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून घेऊन आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही, हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे, हेही ध्यानात घ्यावे.------------------.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
भूषण महाजनआज बाजार अशा पातळीवर आहे, की गुंतवणूकदाराने कुठला शेअर घ्यावा हा विचार करायच्या ऐवजी कुठला घेऊ नये आणि कुठला विकावा हा विचार करणे आवश्यक आहे. शेअर बाजारात संधी नाहीत असे मुळीच नाही. विमा क्षेत्र निवेशकांना हाक मारते आहे. .गेला आठवडा, नव्हे, खरेतर सारा जून महिनाच अविस्मरणीय असा गेला. लोकसभा निवडणुकीचे निकाल ज्या दिवशी जाहीर झाले (ता. ४ जून), त्या दिवशी बाजार कोसळला खरा, पण तेव्हापासून त्याने फारसे मागे वळून पाहिले नाही. मागच्या सप्ताहात तर रोजच निफ्टी वर जात होती. २४ जूनला २३३५०वरून निफ्टीची गाडी जी सुटली, ती २८ तारखेला २४००० अंशालाच थांबली. आम्ही सतत लार्जकॅप्सची आळवणी करत होतो; जून महिन्यात रिलायन्स ११ टक्के व त्याचे तितकेच महाकाय भाऊबंद एचडीएफसी बँक, इन्फोसिस, अल्ट्राटेक तसेच वर गेले. साऱ्यांनीच समाधान दिले. मागील आठवड्याच्या लेखात (अगर डर है... तो कोई डर नही, ता. ६ जुलै) निर्देशलेल्या निफ्टीच्या व सेन्सेक्सच्या पातळ्या - २४००० व ७९००० सर झाल्या. आता पुढे काय? लार्जकॅप शेअर वर जात होते, म्हणून स्मॉल व मिडकॅप शेअर थांबले म्हणावे, तर तेही महिनाभरात ८-९ टक्के वर गेले. उर्दू कवी अहमद फराजचा एक शेर सांगतो :हयात ले के चलो, काएनात ले के चलोचलो तो सारे ज़माने को साथ ले के चलोतेजीत शेअर बाजाराचे सर्वच घटक सामील झाले. छोट्या मोठ्या गुंतवणूकदारांची चांदीच (की सोने) झाली. कंपन्यांचे प्रवर्तकदेखील वाढीव तेजीचा लाभ घेत शेअर विकून मालेमाल झाले. म्युच्युअल फंडांनी यशाचे नवे तुरे रोवले, तर सरकारही आपल्या भाकिताप्रमाणे बाजार वर गेला, यावर स्वतःची पाठ थोपटून घेते झाले. सारा जमाना खूश हुआ!शेअर बाजारात पैसे कमावणे इतके का सोपे असते? नक्कीच नाही. बातम्यांवर वर-खाली होणारा बाजार पाहून गुंतवणूकदारांनी अधिक सावध राहायला हवे. कारण शेअर बाजारात संधी शोधावी लागते. इतकी सहज संधी मिळत असेल, तर कधी दगाफटका होईल ते सांगता येणार नाही. बाजार कधी गळ्यात चुकीचा माल अडकवून टाकेल ते कळणार नाही. असो.दिवस बदलले आहेत, हे नक्की! पूर्वी एखाद्या कंपनीने विस्तार योजना जाहीर केली, की विस्तार कार्यान्वित होऊन, वाढीव उत्पादन बाजारात जाऊन, विक्री त्या प्रमाणात वाढायला किती वेळ जाईल हे सांगता येत नाही, हे बाजाराला कळायचे. त्यानंतर तो शेअर कोल्ड स्टोरेजमध्ये जायचा आणि प्रत्यक्ष उत्पादन सुरू झाले, की त्यात धुगधुगी यायची. आजकाल कंपनीने नवा प्लांट टाकला हे बाजाराला कळायचाच अवकाश, की तो शेअर धावायला लागतो. रंगात आलेल्या बाजारातून नवे भांडवल उभे करणेही फारसे कठीण राहिले नाही. क्यूआयपी पद्धतीने अगदी बाजारभावालाच पैसे उभे राहतात. पूर्वीसारखे कर्ज व राईट इश्यूवर अवलंबून राहावे लागत नाही. मात्र आधीच नुसती बातमी ऐकून वाढलेला हा शेअर नंतर मनाजोगा नफा झाला नाही तर सुस्तावतो. बाजारात अपेक्षाभांगाला मोठी शिक्षा आहे. रसायन क्षेत्रातील कंपन्यांचेच उदाहरण घेऊ. कोविडनंतर जगाने चीनऐवजी भारताकडे बघायला सुरुवात केली. उत्पादन क्षमता पुरी पडेना म्हणून सर्वांनी विस्तार योजना आखल्या. शेअरचे भाव तीन वर्षांत काही पट वाढले. आता या वाढीव क्षमतेचा खर्च, आणि त्यानुसार मिळायला हव्यात तशा ऑर्डर्स हातात नसल्यामुळे ह्या क्षेत्रातील तेजी अचानक कुठे विरली ते कळत नाही. संयम ठेवून दोन वर्षे वाट बघितल्यास पुन्हा पैसे वाढतीलही, पण तोपर्यंत शेअर बाजार वर गेला पण मी घेतलेले ह्या क्षेत्रातील ब्लू चीप शेअर वाढले नाहीत, हे दुःख कुरवाळत बसावे लागेल. .रेल्वे व संरक्षण क्षेत्रात हेच होत आहे. मोठ्या सरकारी ऑर्डर, वाढीव उत्पादन आणि त्यासाठी मोठी भांडवल उभारणी. हे सगळे होत असताना भाव मात्र काही पट वाढले आहेत. रसायन क्षेत्र जात्यात असेल, तर हे क्षेत्र सुपात आहे. आज गुंतवणूक करून अल्पकाळात पैसे मिळतीलही, पण केव्हा बाहेर पडायचे ते ठरवता आले पाहिजे. ते ठरले नाही तर पुढची दोन तीन वर्षे दृढीकरणात जातील. ह्या दोन्ही क्षेत्रांत गुंतवणूक करताना चार वेळा विचार करावा. अगदीच राहवत नसेल तर ट्रेडिंगसारखी किंवा किमान पाच वर्षांसाठी गुंतवणूक (मधल्या काळात भाव न पाहता) करता येईल.वर म्हटलेली विस्तार योजना जाहीर झाल्यानंतर होणारी तेजी बघता, तशीच स्थिती एका कंपनीने दुसरी कंपनी ताब्यात घेतली की होते. आजकाल दोन्ही शेअर वाढतात. सहसा विकत घेणाऱ्या कंपनीचा भाव कमी व्हायला हवा, कारण दुसरी कंपनी घेण्यास भांडवल उभे करावे लागते, ते गंगाजळीतून किंवा कर्ज काढून उभारावे लागते. तो खर्च वर्ग करताना नफा कमी होणार हे नक्की! पण आजचा बाजार ते बघत नाही. बॉश कंपनीने नुकतेच व्हर्लपूलमधील हिस्सा घ्यायचे ठरवले. बॉश ६ टक्के वाढला, तर व्हर्लपूल ९ टक्के. तसेच जेएसडब्ल्यू इन्फ्राने नवकार कॉर्पचा ७० टक्के हिस्सा घेतला. दोन्ही शेअर वाढले. अल्ट्राटेकने इंडिया सिमेंट घ्यायचे ठरवले, दोन्ही शेअर अनुक्रमे ५.४ टक्के व ११ टक्के वाढले. आता याला काय म्हणावे?आज बाजार अशा पातळीवर आहे, की गुंतवणूकदाराने कुठला शेअर घ्यावा हा विचार करायच्या ऐवजी कुठला घेऊ नये आणि कुठला विकावा हा विचार करणे आवश्यक आहे.शेअर बाजारात संधी नाहीत असे मुळीच नाही. विमा क्षेत्र निवेशकांना हाक मारते आहे. गेली तीन वर्षे त्यातील शेअर हललेले नाहीत. ह्या क्षेत्रात आपला एलआयसीचा शेअर पी/ई गुणोत्तरात सर्वात स्वस्त आहे. पण सरकारी मालकी, अत्यंत भक्कम कर्मचारी संघटना व वेळोवेळी सरकारच्या मदतीला धावून जाण्याची तत्परता बघता, एलआयसीच्या शेअर भांडारात काय दडले आहे ह्याचा अंदाज करता येत नाही. अदानी समूहाचा काही हिस्सा असल्यामुळे हिंडेनबर्ग अहवाल व आरोपानंतर हा शेअर कोमेजला होता, पण आता ते किटाळ दूर झाले आहे. एलआयसीची विश्वासार्हता व नाममुद्रा अतुलनीय आहे. नवीन तंत्रज्ञान स्वीकारून पुढील मजल मारता आली, तर यासारखा शेअर नाही. तरी भाव वाढल्यास सरकार भांडवल विक्री करण्याची टांगती तलवार डोक्यावर आहेच. आपल्या रडारवर ठेवू शकतो, पण हात राखून! .या पलीकडे बघायचे झाल्यास स्टार हेल्थचा जरूर अभ्यास करावा. खासगी विमा कंपन्यांत असलेले मूल्यांकन (पी/ई ३८) वाजवी आहे. बाजार भांडवल मूल्य ₹ ३३ हजार कोटी आहे. खासगी आरोग्यविमा क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर असलेली ही कंपनी १८ टक्के दरसाल चक्रवाढ पद्धतीने प्रीमियम गोळा करीत आहे. गेल्या वर्षी तिने ₹ १५ हजार कोटी रुपयांचा प्रीमियम गोळा केला. सर्व नामांकित व दिग्गज खासगी कंपन्यांच्या तुलनेत हा आकडा किमान दुप्पट- तिप्पट आहे. (एचडीएफसी इर्गो ५९७५, तर बजाज ६७१३, आयसीआयसीआय ६४०० कोटी) सात लाखांवर एजंट्स, १५ हजार कर्मचारी व सर्वसामान्य जनतेचा विमा संरक्षक अशी ओळख असलेली ही कंपनी डिसेंबर २०२१मध्ये सूचीबद्ध होताना तिचा भाव ₹ ९४० होता. आज भाव₹ ५६० आहे. तोट्यातून नफ्याकडे वाटचाल झाली असल्यामुळे पुढे ठोस वाढती विक्री व नफावृद्धी दाखवू शकते. आजही झुनझुनवाला कुटुंबीयांकडे १८ टक्के मालकी आहे. आपल्या सल्लागाराला विचारून निर्णय घ्यावा.पूर्वी लोक सिनेमागृहात चित्रपट पाहत. पैसे पूर्ण वसूल व्हावे म्हणून ‘The end’ची पाटी दिसेपर्यंत जागेवरून हलत नसत. आमच्या शेअर बाजाराच्या खेळाला The end नाही. खेळ अव्याहत चालूच राहणार आहे. मालिका एकामागे एक सतत सुरू असतात तसा. घरी टीव्हीवर सिनेमा बघताना जसा अधून मधून आपण ब्रेक घेतो, तसा बाजारातूनही एखादा छोटा ब्रेक घ्यायला हवा. पुन्हा येऊन बसावे. असो.शेअर बाजारात सावध आशावाद ठेवावा. बाजार कधीही कुठल्याही कारणाने किमान ५ टक्के पडू शकतो, हे गृहीत धरावे म्हणजे गुंतवणुकीत अपेक्षाभंग होणार नाही.(भूषण महाजन शेअर बाजाराचे विश्लेषक आहेत.)महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून घेऊन आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही, हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे, हेही ध्यानात घ्यावे.------------------.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.