बऱ्याचदा लोक खूप घट्ट कपडे घालतात, त्यामुळे त्यांना खूप घाम येतो. रक्ताभिसरणही नीट होत नाही. म्हणूनच घट्ट कपडे घालू नयेत. यामुळे केवळ घामच येत नाही, तर काखा आणि इतर ठिकाणी त्वचा ॲलर्जिक होते. त्यामुळे उन्हाळ्यात कधीही घट्ट कपडे घालू नयेत.
तसेच या सीझनमध्ये कपड्यांची निवड करताना कापडाचा प्रकार आणि रंग या दोन गोष्टींकडे अतिशय बारकाईने पाहणे गरजेचे असते. उन्हाळ्यात कोणते कपडे घालावेत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर त्यावर काही पर्याय आहेत.