
पुस्तक परिचय । मंगेश नारायणराव काळे
लेखकाने सुरुवातीपासून आपल्या लेखनातील कथनामागे, मुख्य चरित्रांच्या घडणीमागे दर्शनांचा स्रोत उभा केला आहे. ही चरित्रे स्व-शोधाकडे किंवा अंतिम सत्याच्या शोधाकडे निघालेली आहेत. त्यांना त्यांच्या भवतालाचा असह्य जाच होतो आहे आणि त्यातून सुटण्यासाठी ते एका गूढ, संदिग्ध, अपरिचित वास्तवाचा पाठलाग करत आहेत.
‘The duty of a writer is to tell reality as if it were fiction and fiction as if it were reality’ : Gabriel Garcia Marquez