
Natakwala
Sakal
धनंजय उपासनी
नाटकवाला या आत्मकथेचे महत्त्व वाटण्याची काही कारणे आहेत. मराठी रंगभूमी बहरत असताना, फारसे वलय न लाभलेल्या कित्येकांनी जे योगदान दिले आहे, त्याचा प्रत्यय या पुस्तकात येतो. एखादा कलावंत गैरहजर असणे किंवा नाटक सोडून जाणे आणि तरीही प्रयोग उभा राहणे यासाठी बदली नट किती महत्त्वाचा असतो हे आणि अशा अनेक गोष्टी आपल्याला ही आत्मकथा वाचताना समजतात.