शीतल देसाई
प्राचीन काळापासून मानवाने निसर्गाशी विविध प्रकारे संवाद साधला आहे. या संवादातून शाश्वतता, एकरूपता आणि निसर्गाविषयी असणारा आदर दिसतो. मानवाने देवावरील श्रद्धेने किंवा आदरयुक्त भीतीपोटी वर्षानुवर्षे संरक्षित ठेवलेला जंगलाचा काही भाग म्हणजेच देवराई किंवा देवरहाटी. प्राचीन काळापासून देवाच्या नावाने स्थानिक लोकांनी या जंगलांचे जतन केले आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या विकासाच्या विध्वंसक छायेतून निसर्गाचा काही भाग या देवरायांमुळे सुरक्षित राहिलेला आहे.