Premium|Cyber Laws in India: सायबर कायद्यांविषयीच्या अज्ञानामुळे अनेकजण फसतात; काय आहेत भारतातील सायबर कायदे..?

How awareness of cyber laws can prevent fraud: भारत सरकारने २००८मध्ये माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० या कायद्यात महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या, परंतु त्यानंतर पंधराहून अधिक वर्षे या कायद्यात कोणतीही ठोस सुधारणा झालेली नाही
cyber law in india
cyber law in indiaEsakal
Updated on

योगेश ठाणगे

सायबर कायद्यांविषयीच्या अज्ञानामुळे अनेकजण फसतात. हे अज्ञान दूर करणे म्हणजे केवळ कायदेशीर सुरक्षा नव्हे, तर एक सामाजिक जबाबदारी आहे. ‘माहिती हीच खरी शक्ती’ हे लक्षात घेऊन नागरिकांनी सायबर सुरक्षेबाबत सजग आणि जबाबदार राहायला हवे. तसेच सरकार, शैक्षणिक संस्था, माध्यमे आणि आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांनी एकत्र येऊन ‘जागरूक डिजिटल भारत’ घडवायला हवा.

भारतामधील प्रमुख सायबर कायदे

भारतात सायबर कायद्यांची सुरुवात माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २०००पासून (Information Technology Act, 2000) झाली. १७ ऑक्टोबर २०००पासून अमलात आलेला हा कायदा देशातील पहिला सायबर कायदा ठरला. केवळ सायबर गुन्हे वाढत असल्यामुळे हा कायदा तयार केला गेला असा गैरसमज अनेकदा दिसतो. पण प्रत्यक्षात पाहता हा कायदा तयार करण्यामागे सायबर गुन्ह्यांपेक्षा अधिक मोठी आणि व्यापक कारणे होती. इलेक्ट्रॉनिक व्यवहारांना (E-Commerce), डिजिटल स्वाक्षरीला (Digital Signature) आणि ई-शासनाला (E-Governance) कायदेशीर मान्यता देणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com