Premium|Study Room : २. १० लाख लोकांमागे अवघे १८ न्यायाधीश; न्यायव्यवस्थेतील विलंबाने गुन्हेगारी प्रवृत्तीला मिळतेय बळ?

Pending Cases in Indian Courts 2026 : भारतातील विविध न्यायालयांमध्ये पाच कोटींहून अधिक खटले प्रलंबित असून, न्यायाधीशांच्या प्रचंड कमतरतेमुळे न्यायव्यवस्था संकटात सापडली आहे. सामान्य नागरिकांना न्याय मिळणे कठीण झाल्याने संपूर्ण सामाजिक सुरक्षिततेसमोर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Pending Cases in Indian Courts 2026

Pending Cases in Indian Courts 2026

esakal

Updated on

महेश शिंदे

भारतातील न्यायव्यवस्था आज एका गंभीर समस्येला सामोरी जात आहे, ती म्हणजे न्यायाधीशांची प्रचंड कमतरता. या कमतरतेमुळे लाखो-करोडो खटले वर्षानुवर्षे प्रलंबित राहिले आहेत, ज्यामुळे सामान्य नागरिकांना न्याय मिळणे अत्यंत कठीण आणि वेळखाऊ बनले आहे. हे प्रलंबन केवळ कायदेशीर प्रक्रियेला मंदावत नाही तर संपूर्ण समाजाच्या विश्वासावर आणि न्यायव्यवस्थेच्या मूळ तत्त्वांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते.

प्रलंबित खटल्यांची समस्या

भारतात सध्या विविध न्यायालयांच्या स्तरांवर सुमारे पाच कोटींहून अधिक खटले प्रलंबित आहेत, जी  अत्यंत भयावह आणि चिंताजनक स्थिती दर्शवते, कारण ही संख्या दरवर्षी वाढतच चालली आहे आणि यामुळे न्यायव्यवस्था पूर्णप णे संकटात सापडली आहे. यात सर्वोच्च न्यायालयात सुमारे एक लाखापेक्षा जास्त खटले प्रलंबित आहेत, तर २५ उच्च न्यायालयांमध्ये सुमारे ६१ लाख आणि जिल्हा व कनिष्ठ न्यायालयांमध्ये जवळपास चार कोटी सत्तर लाखांहून अधिक खटले अनेक वर्षापासून सुरू आहेत, ज्यामुळे न्यायदानाची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com