

Women Reservation Bill and Delimitation India
esakal
१३१ वे संविधान दुरुस्ती विधेयक २०२६ हे भारतीय संविधानातील लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण लागू करण्याशी निगडीत घटनादुरुस्तीचे विधेयक आहे. हे विधेयक नारी शक्ती वंदन अधिनियम नावाच्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आणले गेले होते. या विधेयकामुळे महिलांचे राजकीय प्रतिनिधित्व वाढवणे आणि लोकशाहीत त्यांचा समावेश वाढविण्याच्या दृष्टीकोनातून आणले होते.
भारतीय संविधानाच्या कलम ३३४ अ अनुसार, लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी आरक्षणाची गरज सांगण्यात आली आहे. १३१ वी दुरुस्ती या तरतुदीला अधिक ताकद देण्यासाठी आणण्यात आली होती. या विधेयकात सीमांकन (delimitation) संबंधित नियम, जागा वाढवणे आणि केंद्रशासित प्रदेशांचे कायदेशीर स्वरूप बदलणे अशा बाबींचा समावेश होता. यामुळे या विधेयकाला राज्यघटना, प्रशासकीय आणि निवडणूक न्याय अशा अनेक क्षेत्रांत विस्तारणारे परिणाम दिसून येतात.